AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला शेजाऱ्यांचा फटका, ‘या’ देशात ईव्हीची मागणी वाढली

भारताच्या शेजारच्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढत आहे. लोक मोठ्या प्रमाणात ईव्ही खरेदी करत आहेत. पण, त्याचा फटका भारताला बसत आहे.

भारताला शेजाऱ्यांचा फटका, ‘या’ देशात ईव्हीची मागणी वाढली
Electric VehicleImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Aug 08, 2025 | 1:18 AM
Share

भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. 2019-2020 मध्ये नेपाळने केवळ एकच इलेक्ट्रिक वाहन आयात केले होते, परंतु 2024-25 पर्यंत ही संख्या वाढून 13,578 झाली, जी एकूण आयातीच्या 70% पेक्षा जास्त आहे.

इलेक्ट्रिक वाहनांची जगभरातील सरासरी अजूनही 20 टक्क्यांच्या आसपास असल्याने हे एक मोठे यश आहे. यामुळे भारताचेही नुकसान झाले आहे, कारण या बदलामुळे चीनने नेपाळच्या ऑटोमोबाईल मार्केटमध्ये भारताला मागे टाकले आहे. त्याविषयी सविस्तर सांगतो.

2017-18 मध्ये नेपाळने 19,895 वाहने आयात केली होती, त्यापैकी 93.8 टक्के (18,681 वाहने) भारतातून होती. पुढची तीन वर्ष हीच परिस्थिती राहिली, पण 2022-23 नंतर परिस्थिती बदलली. 2024-25 मध्ये नेपाळने एकूण 19,257 वाहने आयात केली, त्यापैकी 53 टक्के चीनची आणि 44% पेक्षा कमी भारताची होती.

याचे कारण काय?

‘या’ बदलाची काही प्रमुख कारणे

नेपाळमध्ये प्रदूषण ही मोठी समस्या आहे, त्यामुळे तेथील सरकारने 2030 पर्यंत 90 टक्के खासगी आणि 60 टक्के सार्वजनिक वाहने इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवरील कर अतिशय कमी ठेवला आहे, तर पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर 180 ते 138 टक्के कर आकारला जातो. त्यामुळे भारतात 10 लाख किमतीची कार नेपाळमध्ये 40 लाखांपर्यंत (25 लाख नेपाळी रुपये) विकली जाते.

स्वस्त मॉडेल: चिनी कंपनी बीवायडीची डॉल्फिन कार नेपाळमधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 41.15 लाख नेपाळी रुपये आहे. तिथे ही कार खूप लोकप्रिय होत आहे.

जलविद्युत: नेपाळमध्ये जलविद्युतपासून अत्यंत स्वस्त वीज आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहने चार्ज करणे स्वस्त होते. नेपाळमध्ये 83 गिगावॅट वीजनिर्मितीची क्षमता आहे.

चार्जिंग स्टेशन – नेपाळमध्ये चार्जिंग स्टेशनचे जाळेही वेगाने वाढत आहे. नेपाळ इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटीने (एनईए) 62 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स आणि खासगी कंपन्यांनी 750 हून अधिक चार्जिंग पॉईंट्स उभारले आहेत. एका कार डीलरने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये आता दर 50 ते 100 किलोमीटर अंतरावर चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहे.

इझी फायनान्स: नेपाळमध्ये इलेक्ट्रिक कारची विक्री वाढण्याचे एक कारण म्हणजे इझी फायनान्स. यापूर्वी नेपाळमधील बँका वाहनांच्या किमतीच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज देत होत्या, त्यामुळे ईव्ही खरेदी करणे सोपे होते. मात्र, नुकतेच हे कर्ज 60 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याने डाऊन पेमेंट दुप्पट झाले आहे. तरीही त्याचा फारसा परिणाम झालेला नाही.

भारतासमोरील आव्हाने: भारतही नेपाळमध्ये काही ईव्ही पाठवत आहे, पण चीनसमोर तो पिछाडीवर आहे. बीवायडी, दीपाल, एमजी आणि एक्सपेंग या चिनी कंपन्यांची नेपाळच्या बाजारपेठेवर चांगली पकड आहे. चिनी कंपन्यांशी स्पर्धा करण्याइतपत भारताचा ईव्ही उद्योग अद्याप वेगाने वाढत नाही.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.