AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram setu : राम सेतूबद्दल या गोष्टी फार कमी जणांना आहे माहिती, किती वर्ष जुना आहे हा पूल

राम सेतूवर अनेक संशोधन झाले आहेत. असे म्हणतात की 15 व्या शतकापर्यंत या पुलावरून रामेश्वरम ते मन्नार बेटापर्यंत चालत जाऊ शकत होते, परंतु वादळांमुळे येथील समुद्र खोल गेला.

Ram setu : राम सेतूबद्दल या गोष्टी फार कमी जणांना आहे माहिती, किती वर्ष जुना आहे हा पूल
राम सेतुImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Mar 10, 2023 | 8:40 PM
Share

मुंबई : वाल्मिकी रामायण आणि रामचरित मानसानुसार भगवान श्रीरामांनी श्रीलंकेला जाण्यासाठी समुद्रावर पूल बांधला होता. त्या पुलाचे अवशेष आजही सापडतात. राम सेतु (Ramsetu) , तमिलनाडु, भारतच्या दक्षिण पूर्व समुद्र किनारी रामेश्वरम बेट तथा श्रीलंकेच्या उत्तर पश्चिमी समुद्र किनाऱ्यावर मन्नार बेटाच्या मध्ये चूनखडकाने बांधलेली एक सेतू आहे. भौगोलिक रचणे नुसार लक्षात येते कि काही काळापूर्वी या सेतूमुळे भारत आणि श्रीलंका यांना जोडणारा हा एक दुवा होता.

राम सेतूबद्दल या पाच गोष्टी आहेत खुपच रंजक

1. 1993 मध्ये, अमेरिकन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (NASA) ने भारताच्या दक्षिणेकडील धनुषकोटी आणि श्रीलंकेच्या वायव्येकडील पंबन दरम्यानच्या समुद्रात 48 किमी रुंद पट्ट्या म्हणून उदयास आलेल्या भूभागाच्या उपग्रह प्रतिमा प्रसिद्ध केल्या. त्यावरून भारतात राजकीय वादाला तोंड फुटले. हा पुलासारखा भूभाग रामसेतू म्हणून ओळखला जाऊ लागला. 14 डिसेंबर 1966 रोजी मिथुन-11 मधून राम सेतूचे चित्र नासाला अवकाशातून मिळाले होते. 22 वर्षांनंतर, ISS 1A ने तामिळनाडू किनारपट्टीवरील रामेश्वरम आणि जाफना बेटांमधील पाण्याखालील भूभाग शोधून काढला. यामुळे अमेरिकन उपग्रहाच्या छायाचित्राला पुष्टी मिळाली.

2. डिसेंबर 1917 मध्ये, सायन्स चॅनेलवरील अमेरिकन टीव्ही शो “प्राचीन लँड ब्रिज” मध्ये, अमेरिकन पुरातत्वशास्त्रज्ञांनी वैज्ञानिक तपासणीच्या आधारे सांगितले की भगवान रामाने श्रीलंकेला पूल बांधण्याची हिंदू पौराणिक कथा सत्य असू शकते. भारत आणि श्रीलंका दरम्यान 50 किमी लांबीची रेषा खडकांपासून बनलेली आहे आणि हे खडक सात हजार वर्षे जुने आहेत तर ज्या वाळूवर हे खडक विसावले आहेत ते चार हजार वर्षे जुने आहेत. नासाच्या उपग्रह प्रतिमा आणि इतर पुराव्यांसह, तज्ञ म्हणतात की खडक आणि वाळूच्या वयातील ही विसंगती असे सूचित करते की हा पूल मानवांनी बांधला असावा.

3. हा पुलासारखा भूभाग रामाचा पूल किंवा राम सेतू म्हणून ओळखला जाऊ लागला. सर्वप्रथम, श्रीलंकेतील मुस्लिमांनी त्याला अॅडम्स ब्रिज म्हणण्यास सुरुवात केली. मग ख्रिश्चन किंवा पाश्चिमात्य लोक त्याला अॅडम्स ब्रिज म्हणू लागले. आदम या पुलावरून गेला असे त्यांचे मत आहे.

4. राम सेतूवर अनेक संशोधन झाले आहेत. असे म्हणतात की 15 व्या शतकापर्यंत या पुलावरून रामेश्वरम ते मन्नार बेटापर्यंत चालत जाऊ शकत होते, परंतु वादळांमुळे येथील समुद्र खोल गेला. 1480 मध्ये चक्रीवादळामुळे ते तुटले आणि समुद्राची पातळी वाढल्याने ते पाण्याखाली गेले.

5. वाल्मिकी रामायण सांगते की जेव्हा श्रीराम सीतेला लंकापती रावणापासून सोडवण्यासाठी लंका बेटावर चढले होते, त्यावेळी त्यांना विश्वकर्माचे पुत्र नल आणि नील यांनी एक पूल बांधून दिला होता, ज्याला बनवण्यात वानरसेनेची मदत झाली होती. या पुलावर तरंगणारे दगड वापरण्यात आले होते जे दुसऱ्या ठिकाणाहून आणले होते. असे म्हणतात की ज्वालामुखीतून निर्माण होणारे दगड पाण्यात बुडत नाहीत. बहुधा हे दगड वापरले गेले असावेत अशी मान्यता आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात.
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा....
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?.