AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी संपत्ती विकून मोदी सरकार मिळविणार 51 हजार कोटी; अर्थसंकल्पातून काय आहे संकल्प

सरकारी संपत्ती विकून मोदी सरकार ५१ हजार कोटी रुपये गोळा करणार आहे. अर्थसंकल्पात हा टार्गेट ठेवण्यात आलाय. सरकारनं हा टार्गेट गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी केलाय.

सरकारी संपत्ती विकून मोदी सरकार मिळविणार 51 हजार कोटी; अर्थसंकल्पातून काय आहे संकल्प
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Feb 01, 2023 | 4:56 PM
Share

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2023 मध्ये सरकारी संपत्ती (government assets) विकून ५१ हजार कोटी रुपयांचं टार्गेट केंद्र सरकारनं ठेवलंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम कमी आहे. केंद्र सरकारनं गुंतवणुकीचे लक्ष्य ५० हजार कोटी रुपये ठेवलंय. यापूर्वी हा टार्गेट ६५ हजार कोटी रुपये होता. गेल्या वर्षी सरकारी संपत्ती विकून १ लाख ७५ हजार कोटी रुपये गोळा करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य होते. यात घट करून ७८ हजार कोटी रुपये लक्ष्य ठेवण्यात आले. आर्थिक वर्ष संपल्यानंतर १३ हजार ६२७ कोटी रुपये गोळा करण्यात आले.

कशाची विक्री करू शकते सरकार

सरकार आयडीबीआय बँक, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, बीईएमएल, कंटनेटर कॉर्पोरेशन ऑफ इंडियात यामधील आपले शेअर कमी करू शकते. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी एलआयसीत आयपीओ आणण्याची घोषणा केली होती. यावर्षी अशाप्रकारची घोषणा करण्यात आली नाही.

सरकारला २० हजार ५१६ कोटींचा फायदा

इंवेस्टमेंट आणि पब्लिक अॅसेट मॅनेजमेंटच्या इंवेस्टमेंटकडून दिलेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारीपर्यंत सरकारने ही सरकारी संपत्ती विकून ३१ हजार १०६ कोटी रुपये मिळविले. त्यात मोठा हिस्सा एलआयसीचा आहे. या कंपनीच्या आयपीओकडून सरकारला २० हजार ५१६ कोटी रुपयांचा फायदा झाला.

सरकारी संपत्ती विकून मोदी सरकार ५१ हजार कोटी रुपये गोळा करणार आहे. अर्थसंकल्पात हा टार्गेट ठेवण्यात आलाय. सरकारनं हा टार्गेट गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी केलाय. पुढील आर्थिक वर्षात २०२३ मध्ये सरकार या माध्यमातून ५१ हजार कोटी रुपयांचं टार्गेट ठेवलंय. हे कितपत पूर्ण होते, हे नंतरच कळेल.

केंद्र सरकार संपत्ती विकून पैसे गोळा करत आहे. यावरून विरोधक नेहमी टीका करत असतात. सरकार चालविण्यासाठी हे सर्व करावं लागत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचं म्हणणंय.

Follow Us
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452 कोटी रुपये... नेमकं काय घडलं?
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन;
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन; रिपब्लिकन पक्षात विलीन होण्याची मागणी
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या,
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या, शाळेत न जाण्याचा इशारा
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत...
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत म्हणाले, बहुसंख्य लोकांची ओढ...
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने मोठी खळबळ
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?