AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा लवकर पूर्ण होणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा मे २०२३ पर्यंत पूर्ण करणार असल्याचं अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितलं. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२५ पर्यंत पूर्ण करणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा लवकर पूर्ण होणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
| Edited By: | Updated on: Mar 09, 2023 | 3:11 PM
Share

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा मे २०२३ पर्यंत पूर्ण करणार असल्याचं अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितलं. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२५ पर्यंत पूर्ण करणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता म्हणून करण्यात येणार आहे. पवनार (वर्धा) ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गासाठी 86,300 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

नागपूर-गोवा महामार्ग असा जाणार

नागपूर-गोवा हा मार्ग माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई ही शक्तीपीठे, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर जोडले जाणार अशी जोडली जाणार आहेत. या महामार्गाचा हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग असा जाणार आहे.

तीन कोटी असंघटित कामगार

3 कोटी असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना राबविणार आहे. ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार आहे. माती कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाईल. संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळाला 25 कोटी रुपये दिले जातील. स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत शिक्षण, पुनर्वसन, रोजगाराच्या योजना राबविणार आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

असंघटित कामगारांसाठी निधीची घोषणा

महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, लिंगायत तरुणांना रोजगार : महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ यांना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे

राज्यात 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार आहेत. त्यामध्ये सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे) यांचा समावेश होतो. मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे सुरू करण्यात येतील.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.