AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोमवार, मंगळवारी बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; बँकिंग सेवेवर परिणाम, सलग सुट्यांमुळे ग्राहकांचे हाल 

सरकारकडून सुरू असलेले बँकांचे खासगीकरण (Privatisation of Banks) थांबवावे तसेच बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक 2021 च्या निषेधार्थ येत्या सोमवारी आणि मंगळवारी बँक कर्मचारी देशव्यापी संपावर (nationwide strike) जाण्याची शक्यता आहे.

सोमवार, मंगळवारी बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; बँकिंग सेवेवर परिणाम, सलग सुट्यांमुळे ग्राहकांचे हाल 
| Updated on: Mar 27, 2022 | 11:45 AM
Share

नवी दिल्ली : सरकारकडून सुरू असलेले बँकांचे खासगीकरण (Privatisation of Banks) थांबवावे तसेच बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक 2021 च्या निषेधार्थ येत्या सोमवारी आणि मंगळवारी बँक कर्मचारी देशव्यापी संपावर (nationwide strike) जाण्याची शक्यता आहे. बँक कर्मचारी संपावर गेल्यास बँका बंद राहातील. काल चौथा शनिवार होता. तसेच आज रविवारची सर्व बँकांना साप्ताहिक सुटी असते. अशा स्थितीमध्ये आणखी दोन दिवस बँका बंद राहिल्यास मोठा फटका बसू शकतो. सलग चार दिवस बँका बंद राहिल्याने एटीएममध्ये पैसे पोहोचणार नाहीत. एटीएममध्ये पैशांचा तुटवडा निर्माण झाल्यास नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. देशव्यापी संपाबाबत बोलताना देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) सांगितले की, या संपामुळे किती नुकसान होऊ शकते याचा अंदाज सध्या तरी लावला जावू शकत नाही.

एटीएममध्ये पैशांचा खडखडात

स्टेट बँक ऑफ इंडियाने पुढे म्हटले आहे की, सोमवारी आणि मंगळवारी कर्मचारी संपवर गेल्यास बँकांना सलग चार दिवस सुटी राहील. यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. कोट्यावधीची उलाढाल ठप्प होईल. एटीएममध्ये पैसा नसल्याने नागरिकांना अडचणी येऊ शकतात. संभाव्य संपाची शक्यता लक्षात घेऊन जास्त प्रमाणात नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती व्यस्था यापूर्वीच करण्यात आल्याचे बँकेने सांगितले.

पश्चिम बंगलामध्ये बँका सुरूच राहणार?

बँक कर्मचाऱ्यांच्या संपाची शक्यता लक्षात घेऊन पश्चिम बंगला सरकारने आधीच आपल्या सर्व सरकारी कर्मचारी आणि बँक कर्मचाऱ्यांसाठी नोटीस जारी केली आहे. येत्या सोमवारी आणि मंगळवारी बँक कर्मचारी देशव्यापी संपावर जाण्याची शक्यता आहे. मात्र पश्चिम बंगाल सरकारच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नियमित कामावर यावे असे आदेश या नोटीसीच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पश्चिम बंगलामध्ये संपाच्या काळात देखील बँका सुरू राहणार का हे पहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Gold-silver price: सोन्याच्या दरवाढीला अखेर ब्रेक, सोन्याचे भाव स्थिर; चांदीच्या दरात घसरण

Petrol,Diesel Price: आठवड्याभरात पाचव्यांदा दरवाढ, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

आजपासून आंतरराष्ट्रीय विमानांच्या नियमित उड्डाणास परवानगी; विदेशवारी स्वस्त होणार?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली