AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर इंडिया खरेदी करण्यासाठी टाटा समूहाची सर्वात मोठी बोली, आता अमित शाह अंतिम निर्णय घेणार

Air India | एअर इंडियाच्या खरेदी प्रक्रियेतील विजेता निश्चित झाला आहे. आता केवळ घोषणेची औपचारिकता बाकी आहे. टाटा समूहाने एअर इंडियाच्या खरेदीसाठी तब्बल 5000 कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविली आहे. एअर इंडियावरील मालकीसाठी वेगवेगळ्या चार निविदा आल्या असल्या तरी टाटा समूहाची बोली ही अग्रेसर मानली जात आहे.

एअर इंडिया खरेदी करण्यासाठी टाटा समूहाची सर्वात मोठी बोली, आता अमित शाह अंतिम निर्णय घेणार
एअर इंडिया
| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 11:03 AM
Share

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच यासंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील समिती एअर इंडियाच्या खरेदीसाठी आलेल्या प्रस्तावांचा विचार करुन लवकरच निर्णय घेईल. यामध्ये टाटा समूहाकडून एअर इंडियासाठी सर्वाधिक बोली लावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता एअर इंडिया पुन्हा टाटा समूहाच्या ताब्यात जाणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या खरेदी प्रक्रियेतील विजेता निश्चित झाला आहे. आता केवळ घोषणेची औपचारिकता बाकी आहे. टाटा समूहाने एअर इंडियाच्या खरेदीसाठी तब्बल 5000 कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविली आहे. एअर इंडियावरील मालकीसाठी वेगवेगळ्या चार निविदा आल्या असल्या तरी टाटा समूहाची बोली ही अग्रेसर मानली जात आहे. टाटा सन्सबरोबरीनेच, स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे स्पर्धेत आहेत. एअर इंडियासाठी निर्धारित करण्यात राखीव किंमतीबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नसला तरी त्यापेक्षा जास्त किमतीवर लावली जाणारी बोली यशस्वी ठरेल. सल्लागार संस्थांकडून यशस्वी बोलीविषयी प्राथमिक चाचपणी पूर्ण झाल्यावर, त्यांच्याकडून येणारी शिफारस ही अंतिम मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठविली जाईल.

टाटा 67 वर्षांनंतर एअर इंडियामध्ये परतणार

जर टाटाची बोली यशस्वी झाली, तर टाटा 67 वर्षानंतर एअर इंडियाला परततील. टाटा समूहाने ऑक्टोबर 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली, ज्याचे नंतर एअर इंडिया असे नामकरण करण्यात आले. सरकारने 1953 मध्ये विमान कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले.

टाटा सिंगापूर एअरलाइन्सच्या भागीदारीत विस्तारा ही प्रीमियम विमान कंपनी चालवते. टाटा समूहाने स्वतःहून किंवा बजेट एअरलाइन्स एअर एशिया इंडियाद्वारे बोली लावली आहे की नाही हे अद्याप माहीत नाही. एअर एशिया इंडिया टाटा सन्स आणि मलेशियाची एअर एशिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेडसाठी एक संयुक्त उपक्रम आहे.

निर्गुंतवणुकीची प्रक्रिया जानेवारी 2020 मध्ये सुरू

निर्गुंतवणुकीची प्रक्रिया जानेवारी 2020 पासून सुरू झाली होती ती कोविड 19 महामारीमुळे स्थगित झाली. सरकारने संभाव्य बोलीदारांना एप्रिल 2021 मध्ये आर्थिक बोली सादर करण्यास सांगितले होते. 15 सप्टेंबर हा निविदा सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. टाटा समूह अशा कंपन्यांपैकी एक होता ज्यांनी डिसेंबर 2020 मध्ये एअरलाइन खरेदी करण्यासाठी इंटेलिशन एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) दिला होता.

एअर इंडिया 2007 पासून तोट्यात

2007 मध्ये देशांतर्गत विमान कंपनी इंडियन एअरलाइन्समध्ये विलीन झाल्यापासून एअर इंडिया तोट्यात आहे. एअरलाइनसाठी यशस्वी बोली लावणाऱ्याला देशांतर्गत विमानतळांवर 4,400 देशांतर्गत आणि 1,800 आंतरराष्ट्रीय लँडिंग आणि पार्किंग स्लॉट तसेच परदेशी विमानतळांवर 900 स्लॉटचे नियंत्रण मिळेल. याव्यतिरिक्त कंपनीला एअरलाइनच्या कमी किमतीच्या सेवा एअर इंडिया एक्सप्रेसची 100 टक्के मालकी आणि AISATS ची 50 टक्के मालकी मिळेल. AISATS प्रमुख भारतीय विमानतळांवर कार्गो आणि ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवते.

संबंधित बातम्या:

67 वर्षांनंतर एअर इंडिया टाटा पुन्हा घेणार?, अधिग्रहणासाठी लावली बोली

कर्मचाऱ्यांकडूनच ‘एअर इंडिया’ विकत घेण्याची तयारी; एक-एक लाख रुपयांची वर्गणी

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.