AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनंत अंबानी यांना कोणता आजार? का सारखे वाढतेय त्यांचे वजन

Anant ambani weight : मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा लवकरच विवाहबंधनात अडकला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा जामनगरमध्ये आयोजत करण्यात आला होता. ज्याला अनेक मोठ्या लोकांनी हजेरी लावली. अनंत अंबानी हे कोणत्या आजाराने ग्रस्त आहेत जाणून घ्या.

अनंत अंबानी यांना कोणता आजार? का सारखे वाढतेय त्यांचे वजन
| Updated on: Mar 06, 2024 | 4:15 PM
Share

Anant Ambani : भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी सध्या चर्चेत आहे. लवकरच तो राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. दोघाचं प्री-वेडिंग फंक्शन गुजरातच्या जामनगरमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला अनेक मोठे नेते, सेलिब्रिटी, उद्योगपती यांनी हजेरी लावली. या सोहळ्या दरम्यान बोलताना अनंत अंबानी याने आपल्या आजारपणाचा उल्लेख केला आहे. ज्यामुळे त्याचे वजन वाढले आहे.

अनंत अंबानींना कोणता आजार?

अनंत अंबानींचे वजन का वाढते? अनंत अंबानींचे वजन आता किती आहे? अनंत अंबानी वजन का कमी करत नाहीत? अनंत अंबानी काय करतात? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत.

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लहानपणापासून अस्थमा या गंभीर आजाराने त्रस्त आहे. दम्याचा उपचार करण्यासाठी त्याला स्टिरॉइड्सचा भारी डोस द्यावा लागतो. त्यामुळे त्यांचे वजन वाढते. कितीही प्रयत्न करूनही त्यांचे वजन कमी होत नाही. कारण तो दम्याचा गंभीर रुग्ण आहे.

लठ्ठपणाची समस्या ?

पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अनंत अंबानी यांनी अवघ्या 18 महिन्यांत 108 किलो वजन कमी केले होते. 2016 मध्ये अनंत अंबानी यांचे वजन 208 किलो होते. त्यानंतर कठोर परिश्रमाने त्यांनी 108 किलो वजन कमी केले होते. मात्र काही वेळाने अनंतचे वजन पुन्हा वाढू लागले. आणि ते पुन्हा लठ्ठपणाचे बळी ठरले.

या आजारावर उपचार काय?

दम्यावर कुठलाही कायमस्वरूपी उपचार नाही. त्याचे परिणाम कमी करण्यासाठी स्टिरॉइड्स द्यावे लागतात. सहसा इनहेलर किंवा टॅब्लेट दिले जाते. वेदनाशामक औषधे लक्षणे कमी करण्यासाठी त्वरीत कार्य करतात. रोगाच्या तीव्रतेनुसार औषधाचा डोस समायोजित करून दम्याची लक्षणे नियंत्रित केली जाऊ शकतात.

या आजाराची लक्षणे काय आहेत

श्वास घेण्यास त्रास होणे. श्वास सोडताना घरघर होणे. छातीत दाब जाणवणे.

अनंत अंबानी यांनी ब्राउन युनिव्हर्सिटीमधून पदवीपर्यंत शिक्षण केले आहे. ते रिलायन्स इंडस्ट्रीजचे काम सांभाळतात. त्यांनी गुजरातमधील जामनगरमध्ये प्री-वेडिंग फंक्शनचे आयोजन केले होते. जेथे त्यांनी तयार केलेल्या वनतारामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. यावेळी प्राण्यांसाठी करत असलेल्या सेवेचे अनेकांनी कौतूक केले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.