AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6 कोटी पीएफ खातेधारकांचा ताण मिटला; पुन्हा काढता येणार कोविड ॲडव्हान्स रक्कम

देशभरातील 6 कोटी पीएफ खातेधारकांसाठी मोठ बातमी आहे. तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेत केंद्र सरकारने कर्मचा-यांना त्यांच्या खात्यांतून 75 टक्के आगाऊ रक्कम काढण्यास पुन्हा परवानगी दिली आहे. त्यामुळे पैशांची चणचण असेल तेव्हा कर्मचा-यांना उचित कारणासह पीएफ खात्यातील रक्कम काढता येईल.

6 कोटी पीएफ खातेधारकांचा ताण मिटला; पुन्हा काढता येणार कोविड ॲडव्हान्स रक्कम
ईपीएफ
| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 8:41 AM
Share

नवी दिल्ली :  देशातील नोकरदार वर्गासाठी चांगली बातमी आहे. आता त्यांना पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम काढता येणार आहे. कोरोना महामारीच्या काळात पीएफ खातेधारकांना (PF account holders) आगाऊ रक्कम(Advance) काढण्याचा लाभ मिळत होता. ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees’ Provident Fund Organisation) पीएफ खातेधारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे. ज्यामुळे भागधारकांना त्यांच्या खात्यातून 75% पर्यंत आगाऊ रक्कम काढता येईल. कोरोनाच्या तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही सवलत देण्यात आली आहे. कोरोना काळात नोकरदार वर्गाचे मोठे हाल झाले. काहींच्या नोक-या गेल्या तर काहींना कमी वेतनावर काम करावे लागत आहे. त्यात पुन्हा तिस-या लाटेची भीती आहे. त्यामुळे कर्मचा-यांना अचानक मोठ्या रक्कमेची आवश्यकता भासल्यास त्याला पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम काढता येणार आहे. ही रक्कम खातेधारक ऑनलाईन पद्धतीने काढू शकतो. भविष्य निर्वाह निधी संघटने याविषयीची सुविधा पुन्हा सुरु केली आहे.

तीन दिवसांत दावा निकाली

याविषयी ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार पीएफचे भागधारक स्वत:च्या किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपचारासाठी किंवा कोरोनानंतरच्या उपचारांसाठी ही आगाऊ रक्कम घेऊ शकतात. विशेष म्हणजे यापूर्वी ज्यांनी पहिल्या आणि दुस-या लाटेच्यावेळी आगाऊ रक्कम काढली होती. त्यांनाही आता पीएफ खात्यातील शिल्लकीतून आगाऊ रक्कम काढता येईल. असे दावे तीन दिवसांत निकाली काढण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

कोविड अॅडव्हान्स मिळवण्यासाठी लाभार्थी सदस्याला दावा अर्ज (Claim Form) भरावा लागेल, ज्यामध्ये मागितलेला तपशील भरावा लागेल. संबंधित तपशील भरल्यानंतर हा दावा ऑनलाईन माध्यमातूनच ईपीएफओकडे पाठवावा लागणार आहे. दावा जमा होताच लाभार्थीला नोंदणीकृत बँक खात्याचा तपशीलही सामायिक (Share) करावा लागणार आहे. एका अंदाजानुसार या सुविधेचा लाभ मार्चपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

कोरोना काळात प्रत्येकाला संकटाला तोंड द्यावे लागले. प्रत्येकाने वाईट काळ अनुभवला. प्रत्येकाच्या कामावर कोरोनाचा परिणाम दिसून आला आहे. अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत. विशेषतः ज्यांच्या घरात वृद्ध अथवा आजारी व्यक्ती आहेत. त्यांच्यासाठी ही कसोटीची वेळ होती. त्यांना उपचारांसाठी पैशांची गरज होती. त्यामुळे कोरोना काळात सुरु करण्यात आलेली अॅडव्हान्सची सुविधा या वर्षी ही सुरुच ठेवणे आवश्यक आहे. कारण खातेधारकाचा पैसा त्याच्या उपयोगात येईल, असे ईपीएफओ बोर्डाचे सदस्य सुखदेव प्रसाद मिश्रा म्हणाले.

 इतर बातम्या:

सिनेमासाठी केवळ एक रूपयाचं मानधन ते अमिताभ बच्चनपेक्षा जास्त फी, फिल्मफेयर पुरस्कार नाकारणारे अभिनेते प्राण यांची 102 वी जयंती

नांदेडच्या अंकिताची मोठी झेप, परिस्थितीवर मात करत मुंबईच्या KEM मध्ये MBBS ला प्रवेश

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.