नवी दिल्ली : यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने आणखी काही सरकारी कंपन्यांची विक्री करण्याचा निर्णय घेतलाय. या अंतर्गत निर्गुंतवणूक करुन 2 लाख कोटी रुपये उभे करण्याची घोषणा करण्यात आलीय. सरकार आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अनेक सरकारी कंपन्या विकून या कंपन्यांमधील आपलं भांडवलं मिळवण्यासाठी निर्गुंतवणुकीकर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसह (BPCL) यात अनेक कंपन्यांचा समावेश आहे (Budget 2021 List of government companies which will be sale to collect revenue by Modi Government).