AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विना इंटरनेट साध्या मोबाईल फोनवरुनही Digital Payment होणार, जाणून घ्या कसे?

आता डिजीटल पेमेंट करण्यासाठी स्मार्टफोनचीही गरज राहिली नसून इंटरनेट नसलेल्या साध्या मोबाईलवरुनही असे व्यवहार करता येणार आहेत.

विना इंटरनेट साध्या मोबाईल फोनवरुनही Digital Payment होणार, जाणून घ्या कसे?
| Updated on: Jan 08, 2021 | 2:16 AM
Share

मुंबई : सध्याचं युग ऑनलाईनचं आहे. खाण्या-पिण्यापासून ते अगदी शॉपिंगपर्यंत आणि फिरण्यापासून मौजमजा करण्यापर्यंत सर्वच ठिकाणी ऑनलाईन पेमेंटमुळे गोष्टी सहजसोप्या झाल्यात. त्यामुळे सोबत रोख पैसे असोत अथवा नसो काहीही फरक पडत नाही. पेटीएम आणि गुगल पे सर्वच यूपीआय सेवा देणाऱ्या डिजीटल पेमेंटचे पर्याय उपलब्ध करुन देतात. त्यामुळे कॅब बुक करणं असो, जेवणाचं बिल देणं असो किंवा मग रेल्वे अथवा विमानाचं तिकिट बूक करणं असो सर्वकाही आपल्या स्मार्टफोनवर शक्य होतं. पण आता हे सर्व करण्यासाठी स्मार्टफोनचीही गरज राहिली नसून इंटरनेट नसलेल्या साध्या मोबाईलवरुनही असे व्यवहार करता येणार आहेत (Digital payment without internet to be possible by non smart phones).

सर्वसामान्य नागरिकांकडे स्मार्टफोन नसल्यास अशा ग्राहकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. अशा ग्राहकांची संख्या देशात मोठी आहे. हेच ओळखून भारतात आता फीचर फोन वापरणाऱ्यांना आपल्या साध्या फोनमधून डिजीटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

RBI कडून Eroute Technologies ला परवानगी

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, “रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)आपल्या रेग्युलेटरी सँडबॉक्स इनिशिएटिव्ह अंतर्गत पहिल्या टप्प्यात Eroute Technologies Private Ltd च्या रिटेल सेवेच्या चाचणीसाठी परवानगी दिली. हा प्रयोग यशस्वी झाल्यास नॉन-स्मार्ट किंवा फीचर फोनचा उपयोग करुन देखील डिजीटल व्यवहार करणं शक्य होणार आहे.

आतापर्यंत डिजीटल पेमेंट करण्यासाठी इंटरनेट आणि स्मार्टफोन आवश्यक मानला जात होता. मात्र, Eroute Technologies च्या यशस्वी चाचपणीनंतर साध्या फोनमधूनही हे डिजीटल व्यवहार करणं शक्य होणार आहे.

हेही वाचा :

Fact Check: आता डिजिटल पेमेंट अ‍ॅपच्या वापरासाठी पैसे मोजावे लागणार?

बँक खात्यामध्ये नाहीत पैसे, तरीही करू शकता UPI पेमेंट, वाचा कसे?

डिजिटल पेमेंट आता अधिक सुरक्षित, ऑनलाईन व्यवहारांना एटीएम पिन नाही

Digital payment without internet to be possible by non smart phones

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.