AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Edible Oil : ऐन थंडीत खाद्यतेलाचे भाव कडाडले; किलोमागे 25 रुपयांची वाढ, ग्राहकांवर संक्रांत

Edible Oil Price Hike : नवी मुंबईतील APMC बाजारात खाद्य तेलाचे दर वाढले. गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या एपीएमसी बाजारामध्ये खाद्य तेलाचे दर हे वाढले आहेत. तेलाच्या एका लिटर मागे 20 ते 25 रुपये वाढ झाल्याचं व्यापार्‍यांनी म्हटले आहे.

Edible Oil : ऐन थंडीत खाद्यतेलाचे भाव कडाडले; किलोमागे 25 रुपयांची वाढ, ग्राहकांवर संक्रांत
खाद्यतेलाचा भडका, भाव कडाडले
| Updated on: Jan 04, 2025 | 3:57 PM
Share

गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेले तेलाचे दराला महागाईची फोडणी बसली आहे. सोयाबीन दरात वाढ आणि केंद्र सरकारच्या 20 टक्के आयात शुल्क लावले आहे. या सर्व घडामोडींमुळे खाद्यतेलाच्या दरात जवळपास 30 टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईतील APMC बाजारात खाद्य तेलाचे दर वाढले. गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या एपीएमसी बाजारामध्ये खाद्य तेलाचे दर हे वाढले आहेत. तेलाच्या एका लिटर मागे 20 ते 25 रुपये वाढ झाल्याचं व्यापार्‍यांनी म्हटले आहे.

जनतेच्या रेट्यानंतर दर खाली

दोन वर्षांपूर्वी देशात महागाईची लाट आली होती. पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या होत्या. सोबतच किरकोळ महागाईने डोके वर काढले होते. खाद्यतेलाचा भडका उडाला होता. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जनक्षोभ वाढला होता. त्यावेळी सरकारने इतर देशातून पामतेल आणि इतर तेल आयात करण्याचे धोरण आखले. त्यामुळे देशातंर्गत खाद्यतेलाच्या किंमती जमिनीवर आल्या.

आता केंद्र सरकारने सोयाबीन दर वाढवला आहे. तर 20 टक्के आयात शुल्क आकारणी सुरू केली आहे. वाशीतील एपीएमसी बाजारात दरमहा 7 ते 8 टन तेलाची आयात होते. पण मागणी वाढल्याने तेलाची आवक कमी झाली आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी झाल्याने खाद्यतेलाचा भाव कडाडला आहे. तेलाचे 30 टक्के दर वधारले आहेत, अशी माहिती एपीएमसीमधील व्यापार्‍यांनी दिली आहे.

असे भडकले खाद्यतेल

सूर्यफूल तेलाचा भाव पूर्वी 120 रुपये प्रति किलो होता. आता त्यात किलोमागे 20 रुपयाची भाव वाढ झाली. सूर्यफूल तेल प्रति किलो 140 रुपयांवर पोहचले. पाम तेलाचा भाव 100 रुपये प्रति किलो होता. हा भाव आता 135-140 रुपयांवर पोहचला आहे. किलोमागे पाम तेल 35-40 रुपयांनी महागले आहे. तर सोयाबीन तेल 115-120 रुपये प्रति किलोवरून थेट 130-135 रुपयांवर पोहचले आहे. किलोमागे 20 रुपयांची दरवाढ दिसून येत आहे. ऐन थंडीत ग्राहकांना वाढीव दराने तेल खरेदी करावे लागत आहे. या महागाईने किचन बजेट कोलमडले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.