AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एटीएम कार्ड चोरीला गेलं तरी पैसे काढता येणार नाही, चोरांना मोठी चपराक, RBI चा एकदम खास प्लॅन

Facial Recognition at ATM: एटीएम वा बँकेच्या शाखेतून आता तुमच्या नावे रक्कम काढणे सोपे नाही. आरबीआय एटीएम, बँक काऊंटर आणि शाखेत ग्राहकांची ओळख पटवल्याशिवाय रक्कम न देण्यासाठी तंत्रज्ञानाचा खास वापर करणार आहे. काय आहे हे तंत्रज्ञान?

एटीएम कार्ड चोरीला गेलं तरी पैसे काढता येणार नाही, चोरांना मोठी चपराक, RBI चा एकदम खास प्लॅन
ग्राहकांना लवकरच मोठा दिलासा
| Updated on: Mar 21, 2026 | 3:22 PM
Share

Facial Recognition at ATM: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँक आता अजून एका फसवणुकीला आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानुसार, एटीएम, बँक काऊंटर आणि बँकेच्या विविध शाखेत चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान (Facial Recognition)वा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सिस्टिम लावण्याचा विचार आहे. त्यामुळे तुमचे एटीएम चोरून जर कुणी पैसा काढण्याचा प्रयत्न केला तर तो व्यवहार होऊ शकणार नाही. उलट चोराचा चेहरा कैद होईल. तर बँक शाखेतही तुमच्या नावे कुणी पैसे काढण्यासाठी आला तर त्याला ओळख पटवून द्यावी लागेल. इकनॉमिक टाइम्सने याविषयीचे एक वृत्त दिले आहे. बँकिंग कामकाज अधिक सुरक्षित करण्यासाठी ही योजना विचाराधीन आहे.

बँकांना द्यावे लागेल उत्तर

याविषयीचा अंतिम निर्णय सार्वजनिक आणि खासगी दोन्ही बँकांची क्षमता बघून घेण्यात येणार आहे. बँकांना या महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांचे उत्तर द्यावे लागेल. या महिन्याच्या आरबीआयने ऑनलाईन आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून ग्राहकांना वाचवण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामध्ये नुकसान भरपाईची तरतूद आहे.

बँक म्हणतात अनेक आव्हानं

ही योजना चांगली असली तरी बँकांसमोर अनेक मोठी आव्हानं आहेत. बँकांना बायोमॅट्रिक सेटअपसाठी मोठा खर्च येणार आहे. तर सेटअप करण्यासाठी बँक शाखेपासून एटीएम केंद्रावर मोठा खर्च आणि वेळ जाणार आहे. त्यासाठी सर्व बँकांना नवीन कॅमेरा, नवीन सॉफ्टवेअर आणि एटीएम स्वीच करावे लागतील. सर्व प्रणाली नव्याने बसवावे लागेल. तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागेल.

डिजिटल फसवणुकीत किती नुकसान?

ऑनलाईन बँकिंग आणि डिजिटल व्यवहारातील वाढते फसवणुकीचे प्रकार लक्षात घेता, आरबीआयने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी पाऊल टाकले आहे. त्यासाठी प्रस्तावही तयार केला आहे. तर डिजिटल फसवणूक झालेल्या ग्राहकांना नुकसान भरपाई मिळते. नवीन नियमानुसार, प्रत्येक व्यक्तीला 50,000 रुपयांपर्यंत जर फसवणूक झाली तर एकूण नुकसानीच्या 85% वाटा अथवा जास्तीत जास्त 25,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल. जर बँकांनी नवीन तंत्रज्ञानाला अनुकूलता दाखवली तर फसवणुकीला मोठा आळा बसेल आणि एटीएम, बँकिंग व्यवहारातील फसवणूक टाळता येईल.

Follow Us
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?.
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर.
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?.
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे.
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी.