AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cancer Anti Drugs : गुडन्यूज, कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा, ही तीन औषधं स्वस्त

Cancer Anti Medicine : कॅन्सर रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आनंदाची बातमी आहे. काही औषधांवरील जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे. तर सीमा शुल्कात पण सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने औषध उत्पादक कंपन्यांना औषधांचे दर कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Cancer Anti Drugs : गुडन्यूज, कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा, ही तीन औषधं स्वस्त
| Updated on: Dec 07, 2024 | 2:39 PM
Share

भारत सरकारने तीन अँटी-कॅन्सर औषधांच्या किंमतीत कपातीचे निर्देश कंपन्यांना दिले आहेत. त्याचा कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फायदा होणार आहे. केंद्रीय रसायन आणि खत राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांनी शुक्रवारी लोकसभेत एक लिखित उत्तर दिले आहे. त्यानुसार, Trastuzumab Deruxtecan, Osimertinib आणि Dervalumab या औषधांच्या कमाल किंमतीत कपतीचे निर्देश देण्यात आले आहेत. या औषधांवरील बेसिक कस्टम ड्युटी शुन्यावर आणण्यात आली आहे. तर जीएसटी दर 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

रुग्णांना मोठा दिलासा

कॅन्सरच्या रुग्णांना आर्थिक फटका बसू नये आणि त्यांचा औषधांवरील खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा मंत्र्यांनी केला. औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी या अधिसूचनांचे पालन करून औषधांच्या किंमती कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. राष्ट्रीय औषधी मूल्य निश्चित प्राधिकरणाने (NPPA) याविषयीच्या बदलाची सूचना दिली आहे.

याशिवाय एनपीपीएने एक सूचना जारी केली आहे. त्यात कॅन्सर औषधी निर्मिती कंपन्यांना दरात कपात करण्याची सूचना देण्यात आली आहे. जीएसटी दर आणि सीमा शुल्कात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्याचा फायदा कॅन्सर रुग्णांना मिळणार आहे. एस्ट्राजेनेका फार्मा इंडिया लिमिटेडने त्यांच्या काही औषधांच्या किंमतीत कपात केल्याची माहिती देण्यात आली आहे.

5 वर्षांपूर्वी 9.3 लाख मृत्यू

केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयानुसार, एस्ट्राजेनेकाने याविषयीचे एक पत्र दिले आहे. त्यात बीसीडी शून्य झाल्याने नवीन बाजारातील स्टॉकची विक्री कमी किंमतीत करण्यात येणार आहे. या निर्णयानंतर या औषधांच्या किंमती अधिक स्वस्त होतील. देशात कॅन्सरच्या रुग्णात वृद्धी होत असल्याचे दिसून आले आहे. एका संशोधनानुसार, 2019 मध्ये भारतात जवळपास 12 लाख नवीन कॅन्सरचे प्रकरण नोंदवण्यात आले आहे. तर 9.3 लाख मृत्यू झाले आहेत. आशिया खंडात कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण असणारा भारत हा दुसरा देश आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रुग्णांना आता उपचारासाठी अधिक खर्च येणार नाही. औषधाच्या किंमतीत कपात झाल्याने त्यांच्यावरील आणि कुटुंबावरील आर्थिक खर्चाचा बोजा कमी होईल. कॅन्सर औषधांवरील खर्चात कपात झाल्याने त्यांच्या खर्चात कपात होणार आहे

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.