AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीमला प्रचंड प्रतिसाद,1.15 लाख कोटीच्या गुंतवणूकीचे प्रस्ताव,रोजगाराच्या संधी निर्माण होणार

इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग योजनेने भारतातील इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे पुनरुज्जीवन केले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीमला प्रचंड प्रतिसाद,1.15 लाख कोटीच्या गुंतवणूकीचे प्रस्ताव,रोजगाराच्या संधी निर्माण होणार
ashwini vaishnav
| Updated on: Oct 02, 2025 | 7:47 PM
Share

इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीमला मोठा प्रतिसाद मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीमने भारतातील इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे पुनरुज्जीवन केले आहे. सरकारला यामुळे विश्वास आहे की यामुळे केवळ गुंतवणूकच आकर्षित होईल असे नव्हे तर रोजगारालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. ECMS ला आतापर्यंत १.१५ लाख कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे प्रस्ताव मिळाले आहेत.

भारतात इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एक नवीन क्रांतीची सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक कंपोनन्ट मॅन्युफॅक्चरिंग स्कीमला(ईसीएमएस) १.१५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे प्रस्ताव मिळाले आहेत. हा आकडा योजनेच्या सुरुवातीच्या लक्ष्यापेक्षा खूप जास्त आहे. आणि यावरुन स्पष्ट होते की मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्सचे निर्माण होणार आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स तसेच आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती दिली की या योजनेंतर्गत गुंतवणूक, उत्पादन आणि रोजगाराचे जे लक्ष्य ठरवले होते त्याहून अधिक जादा प्रस्ताव प्राप्त झाले आहे. त्यांनी सांगितले की अर्जाची प्रक्रीया ३० सप्टेंबर रोजी बंद झाली आणि तोपर्यंत १,१५,३५१ कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव सरकारला मिळाले आहेत.

लक्ष्यापेक्षा दुप्पट जास्त गुंतवणूक

इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगवर लक्ष दिल्याने गेल्या ११ वर्षात जो विश्वास विकसित केला आहे. तो आज गुंतवणूक, उत्पादन आणि रोजगारात बदलत आहे असे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितले. आम्ही ५९,३५० कोटी रुपयांचे एक अत्यंत महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले होते. आणि प्रत्यक्षात आम्हाला १,१५,३५१ कोटी रुपयांचे अर्ज मिळाले आहे. ४,५६,५०० कोटी रुपयांच्या उत्पादनाच्या लक्ष्याच्या तुलनेत आम्हाला १०,३४,००० कोटी रुपयांहून अधिक उत्पादनाचा अंदाज मिळाला आहे.जो आमच्या लक्ष्यापेक्षा दुपटीहून जास्त आहे.

रोजगार आणि आत्मनिर्भरताचा नवा मार्ग

या प्रस्तावांमुळे केवळ गुंतवणूकच नाही तर रोजगाराच्या मोठ्या संधी खुल्या होती. केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की आम्ही ९१,६०० लोकांना रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.प्रत्यक्षात अपेक्षित रोजगार दीड पट म्हणजे १,४१,००० लोकांना रोजगार मिळणार आहे.

देशातील छोट्या उद्योगांनी दाखवला जम

या योजनेची सर्वात महत्वाची बाब म्हणजे सुमारे ६० टक्के अर्ज देशातील छोटे आणि मध्यम उद्योगांतून (MSME) आले आहेत. याचा अर्थ आता सर्वात छोटे उद्योग देखील इलेक्ट्रॉनिक निर्मितीत मोठ्या खेळाडू सोबत खांद्याला खांदा लावून पुढे येत आहेत.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की अनेक कंपन्यांनी डिझाईनची टीम तयार केल्या आहेत. आणि नव्या क्षेत्रात गुंतवणूकीची योजना तयार केले आहे. पहिल्यांदा देशात एसएमडी पॅसिव्ह, फ्लेक्सिबल पीसीबी,लॅमिनेट आणि भांडवली उपकरण सारख्या क्षेत्रात देखील उत्पादन होणार आहे.

Follow Us
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?.

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा