AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16000 रुपयांची SIP केली तर केव्हा बनाल करोडपती?, हा पर्यायही आणखी चांगला

16000 रुपयांच्या मासिक SIP ने एक कोटी रुपयांचा फंड तयार करणे आता गुंतवणूकदारांसाठी एक योग्य पर्याय आहे. 12 टक्के वार्षिक अंदाजित रिटर्नच्या आधारावर हे लक्ष्य किती वर्षात पूर्ण होऊ शकते याचे गणित येथे मांडले आहे.

16000 रुपयांची SIP केली तर केव्हा बनाल करोडपती?, हा पर्यायही आणखी चांगला
SIP investment
| Updated on: Dec 07, 2025 | 9:17 PM
Share

देशात आता वित्तीय जागरुकता वाढली असून लोक बचतीला प्राधान्य देत आहेत. खास करुन म्युच्युअल फंड्समध्ये सिस्टीमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजे SIP हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा लोकप्रिय पर्याय बनला आहे. एसआयपीद्वारे लहान-लहान मासिक गुंतवणूकीतून दीर्घकाळात मोठा फंड तयार करता येतो. यात तर १६ हजार रुपयांच्या मासिक एसआयपीतून १ कोटी रुपयांचा फंड बनवण्यासाठी किती वेळ लागतो ते पाहूयात.

इतक्या वर्षात होणार एक कोटी फंड

जर एखादा व्यक्ती दर महिन्याला १६,००० रुपयांचा एसआयपी करत असेल तर त्याला सरासरी १२ टक्के वार्षिक रिटर्न मिळतो. तर त्याला त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी सुमारे १७ वर्षे लागू शकतात. या अवधीत गुंतवणूकदारांची एकूण गुंतवणूक ३२.६४ लाख रुपये होईल. त्यात अंदाजे रिटर्न सुमारे ७४.२२ लाख पोहचू शकते. याप्रकारे मॅच्युरिटीचा एकूण फंड १.०६ कोटी रुपये होऊ शकतो. हे आकडे अंदाजे आहेत. वास्तविक रिटर्न मार्केटच्या चालीनुसार घटू किंवा वाढू शकते.

SIP का होत आहे सामान्यांचा गुंतवणूक पर्याय

SIP ची सर्वात मोठी खासियत ही आहे की यात गुंतवणूकदाराला एक मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही. तो काही अंतराने छोटी-छोटी रक्कम गुंतवू शकतो. मार्केटमध्ये घसरणीच्यावेळी कमी किंमतीवर जास्त युनिट्स मिळतात. तर तेजी असताना गुंतवणूकीची किंमत वेगाने वाढते. या संपूर्ण प्रक्रियेत कंपाऊंडींग दीर्घकाळात गुंतवणूकीला अनेक पटीने वाढवते. हेच कारण आहे की इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये SIP ला दीर्घकाळात सर्वात प्रभावशील साधन मानले गेले आहे.

स्टेप-अप SIP ने लक्ष्य आणखीन वेगात

जर गुंतवणूकदाराने दरवर्षी त्याच्या SIP रकमेत १० टक्के वाढ केली तर ज्याला स्टेप-अप SIP म्हटले जाते, तर १ कोटी रुपयांचे लक्ष्य आणखी वेगाने साध्य केले जाऊ शकते. १६,००० रुपयांच्या सुरुवातीच्या मासिक एसआयपीमध्ये दर वर्षी १० टक्के वाढ केल्यानंतर १२ टक्के अंदाजित रिटर्नचा रेटने हे लक्ष्य सुमारे १४ वर्षांत पूर्ण होऊ शकते. म्हणजे केवळ गुंतवणूक वाढवण्याच्या रितीने सुमारे ४ ते ५ वर्षांचा वेळ वाचवता येतो.

जोखीम आणि सावधानताही गरजेची

हे समजणे ही गरजेचे आहे की SIP मार्केटशी जोडलेली असते. यात जोखीम देखील असते. रिटर्नची काही गॅरंटी नसते. मार्केटमधील चढ-उतारामुळे वास्तविक रिटर्न अंदाजापेक्षा जास्त किंवा कमीही होऊ शकते. याशिवाय टॅक्स देखली गुंतवणूकीच्या एकूण रिटर्नला प्रभावित करतो. यामुळे गुंतवणूकीच्या आधी आपले उत्पन्न, खर्च आणि जोखीम सहन करण्याची क्षमता आणि वित्तीय लक्ष्य याचे आकलन करणे गरजेचे आहे.

Follow Us
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा.
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा.
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला.
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून....
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून.....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.