India Q2 GDP: खूशखबर! देशाची अर्थव्यवस्था रुळावर, दुसऱ्या तिमाहीत GDP 8.4 टक्क्यांवर पोहोचला!

gdp growth rate of india 2021 : आर्थिक वर्ष 2019-20 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत देशाची GDP वाढ -7.4 टक्क्यांवरून 8.4 टक्के झाली. त्याच वेळी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या (एप्रिल-जून) तिमाहीच्या तुलनेत जीडीपी वाढ 20.1 टक्क्यांवरून 8.4 टक्क्यांवर आली आहे. कृषी विकास 3 टक्क्यांवरून 4.5 टक्क्यांवर पोहोचला आहे.

India Q2 GDP: खूशखबर! देशाची अर्थव्यवस्था रुळावर, दुसऱ्या तिमाहीत GDP 8.4 टक्क्यांवर पोहोचला!
India's GDP
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 7:14 PM

नवी दिल्लीः India Q2 GDP: मोदी सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी देशाच्या GDP ची आकडेवारी जाहीर केलीय. जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशाचा GDP -7.4% वरून 8.4% पर्यंत वाढला. यापूर्वी जून तिमाहीत भारताचा जीडीपी 20.1 टक्के होता. 2021-22 मध्ये स्थिर किमतींवर जीडीपी 35.73 लाख कोटी रुपये होता. यापूर्वी 2020-21 च्या दुसऱ्या तिमाहीत हा आकडा 32.97 कोटी रुपये होता. जून तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था आतापर्यंतच्या सर्वात जलद गतीने वाढली. वर्षभरापूर्वीच्या विक्रमी घसरणीमुळे कमी आधार मिळाला होता. यासह उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रातही वसुली झाली.

दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीच्या आकडेवारीवर एक नजर

आर्थिक वर्ष 2019-20 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत देशाची GDP वाढ -7.4 टक्क्यांवरून 8.4 टक्के झाली. त्याच वेळी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या (एप्रिल-जून) तिमाहीच्या तुलनेत जीडीपी वाढ 20.1 टक्क्यांवरून 8.4 टक्क्यांवर आली आहे. कृषी विकास 3 टक्क्यांवरून 4.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. उत्पादन वाढ -1.5 टक्क्यांवरून 5.5 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. बांधकाम वाढ -7.2 टक्क्यांवरून 7.5 टक्के झाली.

वित्तीय तूट वार्षिक अंदाजाच्या 36.3%

एप्रिल-ऑक्टोबरदरम्यान वित्तीय तूट पूर्ण वर्षाच्या उद्दिष्टाच्या 36.3 टक्के होती. एकूण कराची पावती 10.53 कोटी रुपये आहे. तर एकूण खर्च 18.27 लाख कोटी रुपये झालाय. सरकारने चालू वर्षात वित्तीय तूट 6.8 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मागील वर्षी याच कालावधीत फिजिकल तूट म्हणजेच खर्च आणि महसूल यातील फरक 2020-21 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 119.7 टक्के होता. ऑक्टोबरअखेर ही तूट 5,47,026 कोटी रुपये होती. वार्षिक अंदाज 15.06 लाख कोटी रुपये होता. 2020-21 साठी वित्तीय तूट जीडीपीच्या 9.3 टक्के होती, जी फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पात अंदाजित 9.5 टक्क्यांपेक्षा चांगली आहे.

जीडीपीचा अंदाज काय होता?

बहुतेक तज्ज्ञांनी दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढ 7.5 ते 8.5 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. 44 अर्थशास्त्रज्ञांनी रॉयटर्सच्या सर्वेक्षणाने हे नमूद केलेय. दुसऱ्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था 8.4 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे. RBI ने आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताचा GDP वाढ 9.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. ऑगस्टमध्ये IIP वाढ 11.9 टक्के होती, जी जुलैच्या 11.5 टक्क्यांपेक्षा जास्त होती. विशेष म्हणजे उत्पादन आणि सेवा देखील चांगली होती.

संपूर्ण वर्षासाठी ते 9.4 टक्के राहण्याचा अंदाज

रेटिंग एजन्सी ICRA ने दुसऱ्या तिमाहीत GDP 8.3 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. संपूर्ण वर्षासाठी ते 9.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे. सलग नऊ तिमाहींमध्ये कृषी क्षेत्रातील वाढ 3 टक्क्यांहून अधिक असल्याचे एजन्सीने चांगल्या वाढीचे कारण मानलेय. यामुळे ग्राहकांचा खर्च वाढेल आणि वैयक्तिक वापरही वाढेल, असे एजन्सीचे म्हणणे आहे. एसबीआय संशोधनात जीडीपी वाढ अंदाजे 8.1 टक्के होती. तर GVA 7.1 टक्के नोंदवला गेला. दुसऱ्या तिमाहीत भारताचा 8.1 टक्के विकासदर सर्व अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक असल्याचे त्यांनी म्हटले होते. या वर्षी सप्टेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) 4.4 टक्क्यांनी वाढला आहे. हा आकडा 126.7 इतका होता. GDP हे देशाच्या भौगोलिक सीमांमध्‍ये दिलेल्या कालावधीत वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाचे एकूण मूल्य आहे. जीडीपी विकासदर हा देशाच्या आर्थिक कामगिरीचा एक महत्त्वाचा सूचक आहे.

संबंधित बातम्या

‘या’ व्यवसायात फक्त 25,000 रुपये गुंतवा, दरमहा 2 लाखांपर्यंत कमवा, सरकारचीही मदत

SBI नंतर RBI ची ‘या’ बँकेवर मोठी कारवाई, थेट एक कोटींचा ठोठावला दंड

Non Stop LIVE Update
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.