AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market मध्ये गुंतवणूक नाही करता येणार, हे काम लगेचच करुन घ्या

Share Market | शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. 31 डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करणे गुंतवणूकदारांसाठी आवश्यक आहे. तुम्ही हे काम पूर्ण न केल्यास स्टॉक खरेदी आणि विक्री करता येणार नाही. तर Mutual Fund मध्ये पण गुंतवणूक करताना अडचण येणार आहे.

Share Market मध्ये गुंतवणूक नाही करता येणार, हे काम लगेचच करुन घ्या
तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवले तर तुम्हाला ३१ डिसेंबरपूर्वी नॉमिनी जोडावी लागणार आहे. कारण सेबीने ३१ डिसेंबर ही डिमॅट खात्यात नामांकनाची अंतिम तारीख दिली आहे. जर नॉमिनी जोडला गेला नाही तर, डिमॅट खाते गोठवले जाऊ शकते, ज्यामुळे तुम्ही शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकणार नाही. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असली तरी नॉमिनी जोडणे अनिवार्य आहे.
| Updated on: Dec 23, 2023 | 9:36 AM
Share

नवी दिल्ली | 23 डिसेंबर 2023 : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही मोठी अपडेट समोर आली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना या 31 डिसेंबरपूर्वी हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यांना स्टॉक खरेदी आणि विक्री करण्यासाठी हे काम करणे आवश्यक आहे. नाहीतर त्यांना बाजारातील व्यवहार पूर्ण करता येणार नाही. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पण डीमॅट खातेधारकांना ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी 31 डिसेंबर 2023 ही अंतिम मुदत असेल. या अगोदरच गुंतवणूकदारांना त्यांच्या वारसाचे नाव खात्यात अपडेट करावे लागेल. असे केले नाही तर त्यांना खाते हाताळताना अडचण येईल.

वारसाचे नाव न जोडल्यास काय होईल?

Mutual Fund मध्ये गुंतवणूक आणि स्टॉकमध्ये शेअर खरेदी-विक्री करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत नॉमिनी जोडणे आवश्यक आहे. सेबीने याविषयीचे निर्देश दिले आहे. नाहीतर सेबी व्यवहारावर रोख लावेल. म्युच्युअल फंड खात्यात वारसाचे नाव न जोडल्यास खातेदाराला फंड, रक्कम काढता येणार नाही. तसेच नवीन फंड निवडणे आणि त्यात गुंतवणूक करणे शक्य होणार नाही. त्यामुळे ज्यांनी वारसदाराचे नाव जोडले नाही. त्यांना अडचण येऊ शकते.

का जोडावे वारसाचे नाव

बिझनेस टुडेच्या नावानुसार, वारसाचे नाव जोडल्यास अनेक अडचणी दूर होतील. त्यासाठी जास्त कागदपत्रे देण्याची गरज नाही. त्यामुळे कायदेशीर अडचणी येणार नाहीत. तर फंड ट्रान्सफर आणि गुंतवणूक करणे सोपे होईल. वारसाचे नाव जोडल्यास भविष्यात खातेदाराच्या नंतर त्याच्या वारसाला रक्कम मिळण्यात अडचण येणार नाही. वारसदाराचे नाव न जोडल्यास खात्यातील गुंतवणूक आणि रक्कम काढण्यासाठी दीर्घ प्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते.

कसे जोडणार वारसाचे नाव

वारसदाराचे नाव ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने जोडता येते. तुम्ही ज्या ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करत आहात, त्यावर ऑनलाईन पद्धतीने नाव जोडणी करा. या प्रक्रियेत एकूण 15 मिनिटांचा वेळ लागू शकतो. एक व्यक्ती एकूण 3 वारसदारांची नावे जोडू शकतो. वारसाचे नाव जोडल्यानंतर कोणत्याही अडचणीशिवाय गुंतवणूकदाराला शेअर आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येईल.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.