AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर बाजारात आयपीओचा दुष्काळ; गुंतवणूकदारांची निराशा

शेअर बाजारात (stock market) गेल्या वर्षी आयपीओचा (IPO) पूर आला होता. यंदा मात्र दुष्काळासारखी स्थिती आहे. गेल्या वर्षी प्रत्येक पाचव्या ते सहाव्या दिवशी दररोज एक आयपीओ बाजारात येत होता.

शेअर बाजारात आयपीओचा दुष्काळ; गुंतवणूकदारांची निराशा
शेअर बाजारात आयपीओचा दुष्काळ
| Updated on: Apr 02, 2022 | 5:40 AM
Share

शेअर बाजारात (stock market) गेल्या वर्षी आयपीओचा (IPO) पूर आला होता. यंदा मात्र दुष्काळासारखी स्थिती आहे. गेल्या वर्षी प्रत्येक पाचव्या ते सहाव्या दिवशी दररोज एक आयपीओ बाजारात येत होता. त्यामुळे प्राथमिक बाजारात गुंतवणूकदारांना गुंतवणूक (Investment)करण्याची संधी मिळत होती. 2022 मधील तीन महिने संपले आहेत, तरीही आतापर्यंत फक्त चार कंपन्यांनीच आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात एन्ट्री घेतलीये. गेल्यावर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान 16 कंपन्यांचे आयपीओ आले. 15 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त भागभांडवल आयपीओच्या माध्यमातून कंपन्यांनी उभारलं. म्हणजेच यावर्षी 75 टक्के आयपीओ कमी आले आहेत. तसेच भागभांडवल उभारणीत 57 टक्क्यानं घट होऊन 6707 कोटी झालीये. आयपीओ बाजारात एवढा दुष्काळ का आलाय ? बाजारातील जाणकार यामागे विविध कारणे सांगत आहेत. जाणून घेऊयात त्यामागील नेमकी कारणे काय आहेत ते.

आयपीओ दाखल न होण्याची कारणे

वाढते व्याजदर, कच्चे तेल आणि कमोडिटीची वाढती महागाई शेअर बाजारावर भारी पडताना दिसत आहे. त्यात रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आगीत तेल ओतण्याचं काम सुरू आहे. चीनमधील कोरोनाच्या लाटेमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झालीये.या विविध कारणांमुळे शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे आणि त्यामुळे शेअर बाजारात कंपन्या लिस्टिंग करण्यासाठी उत्साह दाखवत नाहीयेत. एलआयसीच्या आयपीओलाही उशिर झाल्यानं आयपीओच्या बाजारात निरुत्साह आहे. जोपर्यंत LIC चा IPO येणार नाही तोपर्यंत दुसऱ्या कंपन्या उत्साह दाखवणार नाहीत असं सेबीनं मर्चंट बँकेला सांगितलं होतं.

कंपन्यांना संयमाचा सल्ला

आता आयपीओची तयारी करणाऱ्या कंपन्यांना इन्वेस्टमेंट बँकर्सनेही थोडा वेळ वाट पाहण्याचा सल्ला दिलाय. आयपीओच्या माध्यमातून 10 कंपन्या 9800 कोटी रुपयांचे भागभांडवल उभारण्याच्या तयारीत होत्या. आता या कंपन्यांपैकी अनेक कंपन्यांनी आयपीओ स्थगित केलाय किंवा त्याचा आकार कमी केलाय. एकूणच जोपर्यंत जागतिक परिस्थिती ठिक होत नाही तोपर्यंत आयपीओच्या बाजारात निरुत्साह कायम असणार आहे.

संबंधित बातम्या

अरे देवा, Crypto कमाईचे नव्हे फसवणुकीचे मायाजाल, काही क्षणातच गायब संपूर्ण माल

…तर भारतात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार; रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवर घसघशीत सूट

व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ, हॉटेलमधील जेवन महागणार?

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन