AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर बाजारात आयपीओचा दुष्काळ; गुंतवणूकदारांची निराशा

शेअर बाजारात (stock market) गेल्या वर्षी आयपीओचा (IPO) पूर आला होता. यंदा मात्र दुष्काळासारखी स्थिती आहे. गेल्या वर्षी प्रत्येक पाचव्या ते सहाव्या दिवशी दररोज एक आयपीओ बाजारात येत होता.

शेअर बाजारात आयपीओचा दुष्काळ; गुंतवणूकदारांची निराशा
शेअर बाजारात आयपीओचा दुष्काळ
| Updated on: Apr 02, 2022 | 5:40 AM
Share

शेअर बाजारात (stock market) गेल्या वर्षी आयपीओचा (IPO) पूर आला होता. यंदा मात्र दुष्काळासारखी स्थिती आहे. गेल्या वर्षी प्रत्येक पाचव्या ते सहाव्या दिवशी दररोज एक आयपीओ बाजारात येत होता. त्यामुळे प्राथमिक बाजारात गुंतवणूकदारांना गुंतवणूक (Investment)करण्याची संधी मिळत होती. 2022 मधील तीन महिने संपले आहेत, तरीही आतापर्यंत फक्त चार कंपन्यांनीच आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात एन्ट्री घेतलीये. गेल्यावर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान 16 कंपन्यांचे आयपीओ आले. 15 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त भागभांडवल आयपीओच्या माध्यमातून कंपन्यांनी उभारलं. म्हणजेच यावर्षी 75 टक्के आयपीओ कमी आले आहेत. तसेच भागभांडवल उभारणीत 57 टक्क्यानं घट होऊन 6707 कोटी झालीये. आयपीओ बाजारात एवढा दुष्काळ का आलाय ? बाजारातील जाणकार यामागे विविध कारणे सांगत आहेत. जाणून घेऊयात त्यामागील नेमकी कारणे काय आहेत ते.

आयपीओ दाखल न होण्याची कारणे

वाढते व्याजदर, कच्चे तेल आणि कमोडिटीची वाढती महागाई शेअर बाजारावर भारी पडताना दिसत आहे. त्यात रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आगीत तेल ओतण्याचं काम सुरू आहे. चीनमधील कोरोनाच्या लाटेमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झालीये.या विविध कारणांमुळे शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे आणि त्यामुळे शेअर बाजारात कंपन्या लिस्टिंग करण्यासाठी उत्साह दाखवत नाहीयेत. एलआयसीच्या आयपीओलाही उशिर झाल्यानं आयपीओच्या बाजारात निरुत्साह आहे. जोपर्यंत LIC चा IPO येणार नाही तोपर्यंत दुसऱ्या कंपन्या उत्साह दाखवणार नाहीत असं सेबीनं मर्चंट बँकेला सांगितलं होतं.

कंपन्यांना संयमाचा सल्ला

आता आयपीओची तयारी करणाऱ्या कंपन्यांना इन्वेस्टमेंट बँकर्सनेही थोडा वेळ वाट पाहण्याचा सल्ला दिलाय. आयपीओच्या माध्यमातून 10 कंपन्या 9800 कोटी रुपयांचे भागभांडवल उभारण्याच्या तयारीत होत्या. आता या कंपन्यांपैकी अनेक कंपन्यांनी आयपीओ स्थगित केलाय किंवा त्याचा आकार कमी केलाय. एकूणच जोपर्यंत जागतिक परिस्थिती ठिक होत नाही तोपर्यंत आयपीओच्या बाजारात निरुत्साह कायम असणार आहे.

संबंधित बातम्या

अरे देवा, Crypto कमाईचे नव्हे फसवणुकीचे मायाजाल, काही क्षणातच गायब संपूर्ण माल

…तर भारतात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार; रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवर घसघशीत सूट

व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ, हॉटेलमधील जेवन महागणार?

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?