AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC shares : एलआयसीने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली; शेअर्समधील घसरण कधी थांबणार?, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

एलआयसीच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढलीये, अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला.

LIC shares : एलआयसीने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली; शेअर्समधील घसरण कधी थांबणार?, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 07, 2022 | 2:55 PM
Share

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीत (LIC) गुंतवणूक (Investment) केलेले गुंतवणूकदार निराश आहेत. आयपीओमध्ये (IPO) शेअर्स मिळाल्यानंतर नफा बूक करून बाहेर पडण्याची संधी मिळालीच नाही. आयपीओ आल्यानंतर एलआयचीच्या शेअर्सची किंमत 900 रुपये झालीच नाही. कंपनीनं प्रति शेअर दीड रुपयांच्या लाभांशाची घोषणा केली. म्हणजेच ज्यांना 15 शेअर्स मिळाले आहेत त्यांना 22 रुपये 50 पैसे डिव्हिडंट मिळणार आहे. बाजार संकटात आला असताना एलआयसी संकटमोचक म्हणून काम करत होती. सरकारी कंपन्यांचा आयपीओ असू दे किंवा परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री असो एलआयसी प्रत्येक वेळी बाजाराला सांभाळून घेत असे. आता गुंतवणूकदार एलआयसीमध्ये गुंतवणूक करायला पुढे येत नाहीत, त्यामुळे एलआयसीला कोण बाहेर काढणार हा खरा प्रश्न आहे.

शेअर्समध्ये घसरण सुरूच

कंपनीला सहाय्याची गरज आहे. सुरुवातीला लिस्टिंग डिस्काऊंटमध्ये झाली त्यानंतर सतत शेअर्समध्ये घसरण सुरू आहे. त्यातच अपेक्षेप्रमाणं कंपनीचा निकाल सुद्धा लागला नाही. जानेवारी ते मार्च दरम्यान कंपनीच्या निव्वळ नफ्यात 17 टक्क्यांहून जास्त घट झालीये. देशातील अर्ध्यापेक्षा जास्त विमा व्यवसाय एलआयसीच्या हातात आहे, ग्राहकांनी पॉलिसीचे नूतनीकरण न केल्यास नफ्यावर परिणाम होणारच. गेल्या वर्षी 100 पैकी 74 ग्राहक पॉलिसीचे नूतनीकरण करत होते, तो आकडा आता 70 पेक्षा खाली आलाय. एजंटच्या कमिशनवर जास्त खर्च झाल्याची कंपनीनं माहिती दिलीय. त्यातच व्यवस्थापनाचा खर्च 2,800 कोटी रुपये आलाय. कंपनीच्या या खर्चाचा फटका गुंतवणूकदारांना बसलाय.

दीर्घकाळासाठी गुंतवणूक फायद्याची

मात्र, LIC च्या निकालात सॉलव्हन्सी रेशिओबद्दल सकारात्मक माहिती समोर येत आहे. कंपनी बुडाल्यास गुंतवणूकदारांना पैशांची गॅरंटी मिळते. गेल्या वर्षी मार्च त्रैमासिकात सॉलव्हन्सी रेशिओ 1.76 टक्के होता. या वर्षी सॉलव्हन्सी रेशिओ वाढून 1.85 टक्क्यांवर पोहचलाय. हा रेशिओ पाहूनच शेअर बाजारातील तज्ज्ञ दीर्घकाळासाठी एलआयसीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. दीर्घ कालावधीसाठी एलआयसीतील गुंतवणूक फायदेशीर आहे. ज्यांनी आयपीओमध्ये गुंतवणूक केलीय ते सध्या अधिक गुंतवणूक करू शकतात. येत्या दोन ते तीन वर्षांत एलआयसीचा शेअर्स 1,150 रुपयांपर्यंत पोहचेल अशी माहिती जियोजित फाइनेंशियल सर्विसेसचे मुख्य रणनीतिकार गौरांग शाह यांनी दिलीये.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.