Mukesh Ambani | मुकेश अंबानींच्या यशाचे ‘हे’ 5 मंत्र तुम्हालाही श्रीमंत होण्यास मदत करु शकतात

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना संपूर्ण जग ओळखतं.

Mukesh Ambani | मुकेश अंबानींच्या यशाचे 'हे' 5 मंत्र तुम्हालाही श्रीमंत होण्यास मदत करु शकतात
मुकेश अंबानी
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 12:37 PM

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना संपूर्ण जग ओळखतं. त्यांच्या उत्कृष्ट व्यावसायिक ज्ञानामुळे ते सर्वोत्कृष्ट व्यावसायिक समजले जातात. आज अंबानी यांचा 64 वा वाढदिवस आहे. या विशेषप्रसंगी आम्ही तुम्हाला त्यांच्या यशाच्या 5 अशा तत्त्वांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा अवलंब करुन तुम्ही देखील यशस्वी होऊ शकता. या गुरु मंत्रांचे पालन केल्याने तुमच्या जीवनात पैशाची कमतरता कधीच येणार नाही (Mukesh Ambani 5 Mantra To Became Successful And Rich ).

इतरांपेक्षा वेगळा विचार करणे

यशस्वी व्यक्ती हा नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार करतो. मुकेश अंबानींमध्येही हाच गुण आहे. त्यांनी दूरसंचार उद्योगात तो चमत्कार करुन दाखवला जे इतरांसाठी फक्त स्वप्न होते. तुम्हाला 500 रुपयांचा पहिला रिलायन्स मोबाइल फोन आठवतच असेल. मुकेश अंबानी यांनी आपल्या वेगळ्या विचारसरणीतून त्यावेळी सर्वात स्वस्त फोन बाजारात उपलब्ध करुन दिला. या माध्यमातून त्यांनी भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाइल फोन असण्याचे स्वप्न पूर्ण केले. तुम्हालाही यशस्वी व्हायचं असेल तर नेहमीच अंबानींसारखं काहीतरी मोठं करण्याचा विचार करा.

नित्यक्रमात तडजोड करू नका

मुकेश अंबानी हे आज जगासाठी एक सुप्रसिद्ध नाव आहे, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही ते खूप संयमित आहेत. त्यांना त्यांच्या नित्यक्रमाशी कोणतीही तडजोड करायला आवडत नाही. म्हणूनच ते दररोज कार्यालयात जातात आणि रात्री उशिरापर्यंत आपले काम करतात आणि इतर नित्यक्रम मॅनेज करतात. या शिस्तप्रिय त्यांच्या सवयीमुळे ते आजही यशस्वी आहेत. आपण देखील त्यांच्याकडून हे शिकले पाहिजे.

ध्येयावर लक्ष केंद्रित करा

कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी ध्येय निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. तरच आपण हे निश्चित करु शकतो की काय करावे आणि कधी करावे, तसेच याचा परिणाम काय होईल. मुकेश अंबानींच्या यशामागील हे सर्वात मोठे रहस्य हेच आहे. त्यांना आधापासूनच माहिती होती की त्यांना कधी काय करायचं आहे. म्हणूनच, तुम्हालाही त्यांच्यासारखे श्रीमंत आणि यशस्वी व्हायचे असेल तर प्रथम तुमचं ध्येय निश्चित करा.

वडिलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका

असे म्हटले जाते की माणूस तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा त्याच्यावर वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद असतो. मुकेश अंबानींबाबत हे अगदी खरं सिद्ध झालं आहे. आपल्या वडिलांच्या शब्दांकडे ते कधीही दुर्लक्ष करत नव्हते. अंबानी अनेकदा त्यांच्या भाषण आणि मुलाखतीत वडिलांच्या शिकवणीचा उल्लेख करतात. त्यांच्या मते, केवळ वडिलांकडून शिकलेल्या गोष्टींमुळेच ते आज देशातील सर्वात श्रीमंत माणूस होण्यात यशस्वी झाले आहेत. म्हणूनच, अंबानीप्रमाणे तुम्हीही आपल्या वडिलांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

सकारात्मक विचारांनी नशिब बदलू शकते

आपण जे काही काम करत आहात त्यामध्ये तुम्हाला केवळ त्यावेळेस यश मिळेल जेव्हा आपले विचार सकारात्मक असतील. म्हणून जेव्हा आपल्या सभोवताल कोणीही नकारात्मक गोष्टी करत असेल तर त्याकडे लक्ष देण्याऐवजी त्यामध्येही काहीतरी सकारात्मक पाहा. असे केल्याने तुम्ही आयुष्यात पुढे जाल. मुकेश अंबानी यांनीही हेच तत्त्व पाळले आहे.

Mukesh Ambani 5 Mantra To Became Successful And Rich

संबंधित बातम्या :

बाजार मामुली तेजीत आणि मुकेश अंबानींच्या संपत्ती एका दिवसात 22 हजार कोटींची भर

मुकेश अंबानींच्या Z+ सिक्युरिटीचे महिन्याचे 20 लाख रुपये कोण भरतं?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.