Mukesh Ambani | रिलायन्स जिओला (Reliance Jio) टेलिकॉम मार्केटमध्ये धमाका करुन 6 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या कंपनीची जादू अजूनही बाजारावर कायम आहे. 5 सप्टेंबर 2016 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजने टेलिकॉम बाजारात (Telecom Market) पाऊल ठेवले होते. त्यानंतर भारताचं टेलिकॉम मार्केट पूर्णता बदलून गेले. जियो बाजारात येण्यापूर्वी केवळ कॉलिंग (Calling) सुविधेवर कंपन्या जोर देत होत्या. जिओमुळे कंपन्या डेटावर (Data) भर देत आहेत.