AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता बँक बुडाल्यास 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच, पावसाळी अधिवेशनात केंद्राचं विधेयक?

अर्थमंत्र्यांनी डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अधिनियम 1961 मध्ये अर्थसंकल्पात सुधारणा केली होती आणि हे विधेयक जवळपास तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Now, if the bank goes bankrupt, you will get insurance cover up to Rs 5 lakh)

आता बँक बुडाल्यास 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच, पावसाळी अधिवेशनात केंद्राचं विधेयक?
आता बँक बुडाल्यास 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच
| Updated on: Jun 29, 2021 | 6:59 PM
Share

नवी दिल्ली : बँकांमध्ये जमा केलेले तुमचे पैसे आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित असतील. बँकांच्या ठेवीदारांना वेळेवर मदत मिळावी यासाठी सरकार पावसाळी अधिवेशनात डीआयसीजीसी कायद्या(DICGC Act)त दुरुस्ती करणारे विधेयक सादर करू शकते. याचा उद्देश खातेधारकांच्या पैशाचे विमा संरक्षण मर्यादेखाली संरक्षण करणे हा आहे. मागील वर्षी, सरकारने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (PMC Bank) च्या ठेवीदारांना मदत देण्यासाठी ठेव रकमेवरील विमा संरक्षण 5 पट वाढवून 5 लाख रुपये केले. पीएमसी बँकेवरील बंदीनंतर येस बँक आणि लक्ष्मी विलास बँकेचीही स्थिती ढासळली, मात्र त्यांची नियामक आणि सरकारद्वारे पुनर्रचना करण्यात आली. जेव्हापासून पीएमसी बँक संकट उघडकीस आले तेव्हापासून ठेव विम्याचे प्रमाण वाढवण्याची मागणी होत होती. (Now, if the bank goes bankrupt, you will get insurance cover up to Rs 5 lakh)

पावसाळी अधिवेशनात विधेयक सादर होणार

अर्थमंत्र्यांनी डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अधिनियम 1961 मध्ये अर्थसंकल्पात सुधारणा केली होती आणि हे विधेयक जवळपास तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळाचा आढावा घेतल्यानंतर आगामी पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले जाईल, अशी अपेक्षा असल्याचे सूत्रांनी सांगितले. विधेयक लागू झाल्यानंतर पीएमसी बँक आणि अन्य छोट्या सहकारी बँकांसारख्या तणावग्रस्त बँकांमध्ये असलेल्या हजारो ठेवीदारांना त्वरित दिलासा मिळणार आहे.

ठेव विमा म्हणजे काय?

एखादी बँक ढिफॉल्टमध्ये आल्यास किंवा अपयशी ठरल्यास ग्राहकांच्या ठेवी काही प्रमाणात संरक्षित केल्या जातात. याला ठेव विमा असे म्हणतात. ठेव विमा संरक्षण हे एक प्रकारचे संरक्षण कवर आहे. हे बँकेच्या ठेवीदारांना उपलब्ध आहे. डीआयसीजीसी हा विमा पुरवतो. ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संपूर्ण मालकीची कंपनी आहे. सध्याच्या तरतुदीनुसार बँकेचा परवाना रद्द झाल्यावर आणि लिक्विडेशन प्रक्रिया सुरू झाल्यावर 5 लाखांपर्यंतची ठेवी सुरक्षित आहेत.

27 वर्षानंतर झाले बदल

मे 1993 पूर्वी बॅंक बुडण्याच्या घटनेत ठेवीदारास केवळ त्याच्या खात्यात जमा झालेल्या रकमेवर 30,000 रुपयेच परत मिळण्याची हमी होती. वर्ष 1992 मध्ये सुरक्षा घोटाळ्यामुळे यात बदल केले गेले. बँक ऑफ कराड दिवाळखोरीत निघाल्यानंतर विमा ठेवींच्या रकमेची मर्यादा 1 लाख रुपये करण्यात आली. (Now, if the bank goes bankrupt, you will get insurance cover up to Rs 5 lakh)

इतर बातम्या

आता ऑक्सिमीटर आणि ऑक्सिजन केंद्राचा काळा बाजार थांबणार, केवळ एमआरपीमध्ये होणार विक्री

“माझा डॉक्टरांनी”  गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराचं शिवधनुष्य उचलावं – मुख्यमंत्री

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.