AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyber Fraud : खात्यातून चोरी झालेली रक्कम ही मिळविता येते परत? पण वेळीच करावी लागते ही धावपळ..

Cyber Fraud : तुमच्या खात्यातील चोरी गेलेली रक्कम ही परत मिळू शकते, पण त्यासाठी या गोष्टी तातडीने कराव्या लागतील..

Cyber Fraud : खात्यातून चोरी झालेली रक्कम ही मिळविता येते परत? पण वेळीच करावी लागते ही धावपळ..
तुम्ही ही मिळवू शकता रक्कमImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 16, 2022 | 7:21 PM
Share

नवी दिल्ली : तुमच्या खात्यातूनही सायबर भामट्यांनी (Cyber Fraud) रक्कम लाबंवली आहे का? तातडीने तुम्ही जर पावलं उचलली तर तुम्ही ही रक्कम (Amount) परत ही मिळवू शकता. पण त्यासाठी काय करावे लागेल हे तुम्हाला माहिती आहे का? तर समजून घेऊयात या काय प्रक्रिया करावी लागते ते.

आमिषाचे, ऑफरच्या नावाखाली मोठ्या फायद्याचे आमिष दाखविले जाते. त्यातून लोक फिशिंग अटॅकचे शिकार होतात. या लोकांचे बँक खाते झटकन खाली होते. त्यांच्या खात्यातील शिल्लक भामटे साफ करुन टाकतात.

रिझर्व्ह बँकेच्या नावानेही सर्वसामान्य बँक खातेदारांना फसविण्यात येते. वास्तविक रिझर्व्ह बँक थेट ग्राहकांना कोणत्याही ऑफरविषयीचा एसएमएस पाठवत नाही. तुमच्या फायद्यासाठी केंद्रीय बँक कोणताही मॅसेज पाठवित नाही.

तसेच म्युच्युअल फंडात फायद्याचे गणित थोपवत आपल्याला सायबर भामटे जाळ्यात ओढतात. एकादा तुमचा तपशील हाती आला की फिशिंगद्वारे तुमचे खाते हॅक करुन रक्कम काढून घेण्यात येते.

त्यामुळे ऑफरच्या कोणत्याही आमिषाला बळी पडून कोणत्या लिंकवर क्लिक करु नका. त्यामुळे बँकिंग फ्रॉडचे ते शिकार होऊ शकता. एकदा पैसा खात्यातून गेल्यावर तो मिळवण्यासाठी मोठी अडचण येते. पण तो मिळविताच येत नाही असे नाही. योग्यवेळी प्रक्रिया केल्यास तुमचा पैसा परत मिळविता येऊ शकतो.

खात्यातून गायब झालेला पैसा परत मिळू शकतात. अटी आणि नियमांचे पालन करुन तुम्हाला ही रक्कम मिळविता येईल.

यामधील पहिला नियम म्हणजे ही माहिती त्वरीत पोलिसांना देणे गरजेचे आहे. तसेच बँकेलाही याविषयीची माहिती देणे आवश्यक आहे.

दुसरा नियम म्हणजे तुम्ही एखाद्या सायबर फ्रॉडच्या चक्रात अडकला आणि तुमच्या खात्यातील रक्कम गायब झाली तर बँकेच्या अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी. त्यासाठी काहीही खोटं बोलण्याची गरज नाही. फसवणूक कशी झाली याची माहिती द्यावी.

तुमच्या तक्रारीवर बँक अधिकारी पुढील प्रक्रिया करतील. तुम्ही तक्रार करण्यास जेवढा उशीर केला, तेवढ्या अडचणी वाढतील. तसेच तेवढे तुमचे नुकसानही वाढेल.

बँकेकडे तक्रार केल्यानंतर तुमचा तक्रार क्रमांक विचारुन घ्या. त्याची तुमच्याकडे नोंद करुन घ्या. एकादा तुम्ही बँकेकडे तक्रार केल्यानंतर बँकेला 90 दिवसांत तुमच्या तक्रारीचा निपटारा करावा लागतो.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत