AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील 12 सरकारी बँकांचे विलिनीकरण; तुमच्या खात्याचे काय होणार, खातेधारकांवर काय परिणाम?

PSB Merger : मोदी सरकारने, सरकारी बँकांच्या विलिनीकरणासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. देशातील 12 सरकारी बँकांचे विलिनीकरण करण्यात येणार असल्याची वार्ता समोर आली आहे. अशावेळी तुमच्या बँक खात्याचे होणार काय?

देशातील 12 सरकारी बँकांचे विलिनीकरण; तुमच्या खात्याचे काय होणार, खातेधारकांवर काय परिणाम?
बँकांचे विलिनीकरण
| Updated on: Sep 11, 2025 | 11:15 AM
Share

मोदी सरकारने देशातील 12 सरकारी बँकांच्या विलिनीकरणासाठी पुन्हा कंबर कसल्याचे समोर येत आहे. यापूर्वीही मोदी सरकारने असा प्रयोग केला आणि देशातील सरकारी बँकांची संख्या कमी केली. आताही तोच प्रयोग होण्याची शक्यता आहे. या विलिनीकरणाला अर्थातच बँक कर्मचारी संघटनांचा जोरदार विरोध आहे. या विलिनीकरणातून सरकारला बरंच काही साध्य करायचं आहे. सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSBs) यांच्यामध्ये येत्या दोन-तीन दिवसात याविषयीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

आता देशात 4-5 सरकारी बँका

सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 12-13 सप्टेंबर रोजी बैठक होईल. या बैठकीत बँकिंग सुधारणेवर चर्चा होईल. दोन वर्षांनी अशा प्रकारची बैठक होत आहे. यामध्ये बँकांसाठीचा रोडमॅप, त्यांचा आकार, जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठीची रणनीती, एआयचा वापर, गुड गव्हर्नन्स, ग्राहकांना झटपट सेवा याविषयी चर्चा होईल. या बैठकीला RBI चे डिप्टी गवर्नर स्वामीनाथन जे. आणि कंसल्टिंग फर्म McKinsey चे सदस्य पण उपस्थित असतील.

सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारी बँकांच्या विलिनीकरणाची चर्चा रंगणार आहे. देशातील 12 सरकारी बँकांचे विलिनीकरण करून केवळ 4 ते 5 मोठ्या सरकारी बँका तयार करण्यात येतील. याच बँका कारभार हाकतील. जागतिकरणाचा हाकारे वाजत असताना बँकिंग क्षेत्रालाही या स्पर्धेत उतरण्यासाठी सरकार दरबारी मोठी तयारी सुरू असल्याचे कळते.

2020 मध्ये सरकारने विलिनीकरणाची मोठी प्रक्रिया राबवली होती. त्यामुळे सरकारी बँकांची संख्या 27 वरून थेट 12 वर आली. आता सरकार अर्थव्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी आणि तिसऱ्या क्रमांकावर झेप घेण्यासाठी बँकांच्या विलिनीकरणासाठी आग्रही असल्याचे समोर येत आहे. विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे पाऊल टाकल्याचे समोर येत आहे.

खातेधारकांवर काय होईल परिणाम?

बँकांच्या विलिनीकरणामुळे खातेधारकांवर काय परिणाम होणार असा सवाल त्यांच्या मनात आहे. त्यांच्या बँक खात्यातील जमा रक्कम, मुदत ठेव, आवर्ती मुदत ठेव आणि इतर ठेवींचे काय होणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तर तुमच्या कोणत्याही गुंतवणुकीवर आणि ठेवीवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही. बँकांच्या विलिनीकरणामुळे थोडा कागदपत्रांचा ताप होईल. बँकेचे नाव, IFSC Code बदलेल. खातेदारांचा जुना ग्राहक क्रमांक आणि खाते क्रमांक पण बदलेल.

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.