AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Global Citizen | श्रीमंतांची देश सोडण्यासाठी रीघ..का चालले अब्जाधीश देश सोडून..

Global Citizen | एका ग्लोबल सर्व्हेनुसार या वर्षाच्या शेवटपर्यंत अनेक अब्जाधीश भारत सोडणार आहेत. पण यामागची कारणे काय आहेत?

Global Citizen | श्रीमंतांची देश सोडण्यासाठी रीघ..का चालले अब्जाधीश देश सोडून..
का सोडून चालले श्रीमंत देश?Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 21, 2022 | 11:52 AM
Share

नवी दिल्ली : श्रीमंत भारतीयांना (Richest Indians) प्यारा हिंदुस्थान सोडण्याची घाई झाली आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत अनेक अब्जाधीश भारत सोडण्याचा (Migration) दावा करण्यात येत आहे. Henley Global Citizen यांनी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.

आता या यादीत उद्योजकच नाही तर कॉर्पोरेट अधिकारी, नोकरशहा, मोठे अधिकारी यांचा समावेश आहे. पण भारतात आतापर्यंत विविध लाभ घेऊन कष्टाने श्रीमंत झालेला हा वर्ग अचानक देश सोडून जात असल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

आता तुम्ही म्हणाल जातील 50-100 माणसं तर काय मोठा फरक पडणार आहे.  तर थांबा.  कारण हा आकडा वाटतो तेवढा लहान नाही. तब्बल 8000 श्रीमंत भारतीय देशाला कायमचा रामराम ठोकण्याच्या मार्गावर असल्याचा दावा या सर्वेक्षणात करण्यात आला आहे.

एकीकडे सर्वात वेगाने झेपवणारी अर्थव्यवस्था म्हणून डंका पिटवत असताना आणि कोरोनाला चारीमुंड्या चीत करणाऱ्या भारताला हा नव पलायनवाद एक धक्काच ठरू पाहत आहे. इतर देशांपेक्षा सोयी-सुविधाही चांगल्या मिळत असताना देशाबाहेर जाणाऱ्यांचा हा मोठा आकडा धक्कादायक आहे.

पासपोर्टचे कडक नियम आणि उद्योगांना मिळणाऱ्या कमी सवलती, इतर अन्य कारणांमुळे हे पलायन वाढले आहे. एक स्वस्त, सुरक्षित आणि नैसर्गिक वातावरणात मोठे अलिशान घर असावे अशा इच्छेतूनही देश सोडण्यात येत आहे.

काही श्रीमंत कर रचनेवर प्रचंड नाराज आहे. त्यांना देशात जादा कर द्यावा लागत आहे. कराचा बोजा उत्पन्नाचा मोठा भाग खाऊन टाकत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे नाराजीमुळे ते देश सोडत आहे. कमी प्रदूषण असलेल्या देशात, निसर्गाच्या सान्निध्यात व्यापार उदीम वाढवण्यास वेळ मिळत असल्याने श्रीमंत भारतीय देश सोडण्याचा दावा करण्यात येत आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.