AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Global Citizen | श्रीमंतांची देश सोडण्यासाठी रीघ..का चालले अब्जाधीश देश सोडून..

Global Citizen | एका ग्लोबल सर्व्हेनुसार या वर्षाच्या शेवटपर्यंत अनेक अब्जाधीश भारत सोडणार आहेत. पण यामागची कारणे काय आहेत?

Global Citizen | श्रीमंतांची देश सोडण्यासाठी रीघ..का चालले अब्जाधीश देश सोडून..
का सोडून चालले श्रीमंत देश?Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 21, 2022 | 11:52 AM
Share

नवी दिल्ली : श्रीमंत भारतीयांना (Richest Indians) प्यारा हिंदुस्थान सोडण्याची घाई झाली आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत अनेक अब्जाधीश भारत सोडण्याचा (Migration) दावा करण्यात येत आहे. Henley Global Citizen यांनी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.

आता या यादीत उद्योजकच नाही तर कॉर्पोरेट अधिकारी, नोकरशहा, मोठे अधिकारी यांचा समावेश आहे. पण भारतात आतापर्यंत विविध लाभ घेऊन कष्टाने श्रीमंत झालेला हा वर्ग अचानक देश सोडून जात असल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

आता तुम्ही म्हणाल जातील 50-100 माणसं तर काय मोठा फरक पडणार आहे.  तर थांबा.  कारण हा आकडा वाटतो तेवढा लहान नाही. तब्बल 8000 श्रीमंत भारतीय देशाला कायमचा रामराम ठोकण्याच्या मार्गावर असल्याचा दावा या सर्वेक्षणात करण्यात आला आहे.

एकीकडे सर्वात वेगाने झेपवणारी अर्थव्यवस्था म्हणून डंका पिटवत असताना आणि कोरोनाला चारीमुंड्या चीत करणाऱ्या भारताला हा नव पलायनवाद एक धक्काच ठरू पाहत आहे. इतर देशांपेक्षा सोयी-सुविधाही चांगल्या मिळत असताना देशाबाहेर जाणाऱ्यांचा हा मोठा आकडा धक्कादायक आहे.

पासपोर्टचे कडक नियम आणि उद्योगांना मिळणाऱ्या कमी सवलती, इतर अन्य कारणांमुळे हे पलायन वाढले आहे. एक स्वस्त, सुरक्षित आणि नैसर्गिक वातावरणात मोठे अलिशान घर असावे अशा इच्छेतूनही देश सोडण्यात येत आहे.

काही श्रीमंत कर रचनेवर प्रचंड नाराज आहे. त्यांना देशात जादा कर द्यावा लागत आहे. कराचा बोजा उत्पन्नाचा मोठा भाग खाऊन टाकत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे नाराजीमुळे ते देश सोडत आहे. कमी प्रदूषण असलेल्या देशात, निसर्गाच्या सान्निध्यात व्यापार उदीम वाढवण्यास वेळ मिळत असल्याने श्रीमंत भारतीय देश सोडण्याचा दावा करण्यात येत आहे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.