AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PPF, SCSS, KVP अन् NSC…,खाती होऊ शकतात फ्रीज, टपाल विभागाचा नवा आदेश काय?

post office schemes: टपाल विभाग खाते फ्रीज करण्याची ही प्रक्रिया वर्षातून दोन वेळा राबवणार येणार आहे. दरवर्षी १ जुलै आणि १ जानेवारी रोजी ही प्रक्रिया सुरु होऊन १५ दिवसांच्या आता पूर्ण करण्यात येणार आहे.

PPF, SCSS, KVP अन् NSC...,खाती होऊ शकतात फ्रीज, टपाल विभागाचा नवा आदेश काय?
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 18, 2025 | 11:25 AM
Share

पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून विविध बचत योजना राबवल्या जातात. पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ, वरिष्ठ नागरिक गुंतवणूक योजना (SCSS), सुकन्या समृद्धी योजना (KVP) किंवा राष्ट्रीय बचत योजनेत (NSC) खाती उघडली असतील तर फ्रीज होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात टपाल विभागाकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे. टपाल विभागाने म्हटले आहे की, बचत योजनेअंतर्गत ज्यांची खाती मुदतपूर्ती तारखेपासून तीन वर्षांनंतरही वाढवली गेली नाही, ती खाती गोठवण्यात येणार आहे.

वर्षातून दोन वेळा प्रक्रिया

टपाल खात्याने खाती फ्रीज करण्याबाबत नियमित प्रक्रिया करण्याचे आदेश दिले आहेत. ही प्रक्रिया वर्षातून दोन वेळा करण्यात येणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या सुरक्षित खात्यांची ओळख करता येणार आहे. आदेशात पुढे म्हटले आहे की, लघु बचत योजनेतील गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवावे की जर ते मुदतपूर्तीच्या ३ वर्षांच्या आत त्यांनी खाते बंद केले नाहीत तर त्यांची खाती गोठवली जातील.

आदेशात म्हटले आहे की, स्‍माल सेव्हींग स्कीममध्ये मासिक उत्पन्न योजना (एमआयएस), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस), किसान विकास पत्र (केव्हीपी), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), आवर्ती ठेव (आरडी) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) खाती समाविष्ट आहेत.

खाते फ्रीज झाल्यावर काय होणार?

मुदतपूर्तीनंतर खाते फ्रीज झाले तर त्यातून खातेदार कोणताही व्यवहार करु शकणार नाही. खात्यातून पैसे काढता येणार नाही किंवा खात्यात पैसेही भरता येणार नाही. ऑलनाइन सेवांचा वापर करता येणार नाही. म्हणजेच तुम्ही पैशांचे कोणतेही व्यवहार करु शकणार नाही.

खाते फ्रीज करण्याची ही प्रक्रिया वर्षातून दोन वेळा राबवण्यात येणार आहे. दरवर्षी १ जुलै आणि १ जानेवारी रोजी ही प्रक्रिया सुरु होऊन १५ दिवसांच्या आता पूर्ण करण्यात येणार आहे. म्हणजेच ३० जून आणि ३१ डिसेंबर रोजी मुदतीनंतर तीन वर्ष सुरु असणाऱ्या खात्यांची ओळख करण्यात येणार आहे. त्यानंतर ती खाती फ्रीज करण्यात येणार आहेत.

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?