AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा पैसा या बँकेत एकदम सुरक्षित, स्टेट बँक ऑफ इंडियाचा क्रमांक कितवा?

Government Bank | प्रत्येकाच्या तोंडी सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे नाव आहे. मग इतर बँक सुरक्षित नाहीत का? बँकिंग सुरक्षेचे नाव निघाले की, सर्वात अगोदर एसबीआयचे नाव निघते. एसबीआयबाबत ग्राहक डोळे झाकून ही बँक सुरक्षित असल्याची हमी देऊन टाकतात. मग इतर बँकांमध्ये कोणती बँक सुरक्षित आहे?

तुमचा पैसा या बँकेत एकदम सुरक्षित, स्टेट बँक ऑफ इंडियाचा क्रमांक कितवा?
| Updated on: Dec 22, 2023 | 3:55 PM
Share

नवी दिल्ली | 22 डिसेंबर 2023 : सर्वसामान्य नागरिक सरकारी बँकांवर डोळे झाकून भरवसा ठेवतो. ते विना चिंता त्यांच्या कष्टाचा पैसा बँकांमध्ये बिनधास्तपणे जमा करतात. पण आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या काही वर्षांत सरकारी बँकांसंबंधीच्या अनेक नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. सध्या खासगीकरणाचे वारे वाहत आहे. सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून हिस्सेदारी विक्री करत आहे. तर काही वर्षात काही सरकारी बँक बंद करुन त्या दुसऱ्या बँकेत विलीन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणती बँक सर्वाधिक सुरक्षित याचा अंदाजा तरी कसा लावणार नाही का?

दोन प्रकारचे सरकारी बँक

देशात सध्या दोन प्रकारचे सरकारी बँक आहेत. एक एसबीआय आणि दुसऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील इतर बँका. यामध्ये एक फरक आहे. एसबीआयची स्थापना स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा, 1955 अंतर्गत करण्यात आली आहे. यापूर्वी देशात या बँकेला इंपीरिअल बँक ऑफ इंडिया असे नाव होते. या बँकेची स्थापना इंग्रजांनी 1806 मध्ये केली होती. स्वातंत्र्यानंतर 1955 मध्ये बँकेचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया असे करण्यात आले. तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अधिग्रहण करण्यात आले. या काळात कायद्याचा वापर करत काही खासगी बँका सरकारने पंखाखाली घेतल्या. तांत्रिक बाबी सोडल्या तर जवळपास या बँका सुरक्षेच्या दृष्टीने समानच म्हणाव्या लागतील.

उदारीकरणानंतर बदलले नियम

यानंतर देशात 1991 मध्ये उदारीकरणाची प्रक्रिया सुरु झाली. 1994 मध्ये बँकिंग कंपनी कायद्यात मोठा बदल झाला. कायद्यात सुधारणा होण्यापूर्वी सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच बँकांमध्ये सरकारची 100 टक्के हिस्सेदारी होती. 1994 मध्ये कायद्यात सुधारणा करण्यात आली. वाटा 51 पर्यंत आणण्यात आला. एसबीआय संपूर्ण देशात आरबीआयची प्रतिनिधी म्हणून काम करते. 1955 मधील कायद्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेतील हिस्सेदारी 55 टक्क्यांपेक्षा कमी नसेल.

कोणत्या बँकेत सरकारचा वाटा किती?

  • स्टेट बँकेत हा वाटा जवळपास 57.5 टक्के
  • बँक ऑफ बडोदामध्ये 63.97 टक्के हिस्सेदारी
  • कॅनेरा बँकेत सरकारचा वाटा 62.93 टक्के
  • पंजाब नॅशनल बँकेत हा वाटा 73.15 टक्के
  • इंडियन बँकेमध्ये सरकारचा हिस्सा 79.86 टक्के
  • युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 83.49 टक्के वाटा
  • बँक ऑफ इंडियामध्ये 81.41 टक्के हिस्सा
  • सेंट्रल बँक ऑफ इंडियात 93.08 टक्के हिस्सेदारी
  • बँक ऑफ महाराष्ट्रात हा वाटा 85 टक्के आहे
  • युको बँकमध्ये सरकारचा वाटा 95.39 टक्के
  • इंडियन ओव्हरसीज बँकेत 96.38 टक्के वाटा
  • पंजाब अँड सिंध बँकेत 98.25 टक्के हिस्सा

कोणत्या बँका आहेत सुरक्षित

  1. बँकिंग नियमामुळे भारतीय बँकिंग क्षेत्र सुरक्षित
  2. आरबीआयचे सर्वच बँकिंग क्षेत्रावर नियंत्रण
  3. सुरक्षित बँकेत दीर्घकाळापासून एसबीआयाचा पहिला क्रमांक
  4. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर खासगी बँक एचडीएफसी, आयसीआयसीआय
  5. चौथ्या आणि पाचव्या स्थानी पीएनबी आणि बँक ऑफ बडोदा

Follow Us
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली