AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा पैसा या बँकेत एकदम सुरक्षित, स्टेट बँक ऑफ इंडियाचा क्रमांक कितवा?

Government Bank | प्रत्येकाच्या तोंडी सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे नाव आहे. मग इतर बँक सुरक्षित नाहीत का? बँकिंग सुरक्षेचे नाव निघाले की, सर्वात अगोदर एसबीआयचे नाव निघते. एसबीआयबाबत ग्राहक डोळे झाकून ही बँक सुरक्षित असल्याची हमी देऊन टाकतात. मग इतर बँकांमध्ये कोणती बँक सुरक्षित आहे?

तुमचा पैसा या बँकेत एकदम सुरक्षित, स्टेट बँक ऑफ इंडियाचा क्रमांक कितवा?
| Updated on: Dec 22, 2023 | 3:55 PM
Share

नवी दिल्ली | 22 डिसेंबर 2023 : सर्वसामान्य नागरिक सरकारी बँकांवर डोळे झाकून भरवसा ठेवतो. ते विना चिंता त्यांच्या कष्टाचा पैसा बँकांमध्ये बिनधास्तपणे जमा करतात. पण आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या काही वर्षांत सरकारी बँकांसंबंधीच्या अनेक नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. सध्या खासगीकरणाचे वारे वाहत आहे. सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून हिस्सेदारी विक्री करत आहे. तर काही वर्षात काही सरकारी बँक बंद करुन त्या दुसऱ्या बँकेत विलीन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणती बँक सर्वाधिक सुरक्षित याचा अंदाजा तरी कसा लावणार नाही का?

दोन प्रकारचे सरकारी बँक

देशात सध्या दोन प्रकारचे सरकारी बँक आहेत. एक एसबीआय आणि दुसऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील इतर बँका. यामध्ये एक फरक आहे. एसबीआयची स्थापना स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा, 1955 अंतर्गत करण्यात आली आहे. यापूर्वी देशात या बँकेला इंपीरिअल बँक ऑफ इंडिया असे नाव होते. या बँकेची स्थापना इंग्रजांनी 1806 मध्ये केली होती. स्वातंत्र्यानंतर 1955 मध्ये बँकेचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया असे करण्यात आले. तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अधिग्रहण करण्यात आले. या काळात कायद्याचा वापर करत काही खासगी बँका सरकारने पंखाखाली घेतल्या. तांत्रिक बाबी सोडल्या तर जवळपास या बँका सुरक्षेच्या दृष्टीने समानच म्हणाव्या लागतील.

उदारीकरणानंतर बदलले नियम

यानंतर देशात 1991 मध्ये उदारीकरणाची प्रक्रिया सुरु झाली. 1994 मध्ये बँकिंग कंपनी कायद्यात मोठा बदल झाला. कायद्यात सुधारणा होण्यापूर्वी सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच बँकांमध्ये सरकारची 100 टक्के हिस्सेदारी होती. 1994 मध्ये कायद्यात सुधारणा करण्यात आली. वाटा 51 पर्यंत आणण्यात आला. एसबीआय संपूर्ण देशात आरबीआयची प्रतिनिधी म्हणून काम करते. 1955 मधील कायद्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेतील हिस्सेदारी 55 टक्क्यांपेक्षा कमी नसेल.

कोणत्या बँकेत सरकारचा वाटा किती?

  • स्टेट बँकेत हा वाटा जवळपास 57.5 टक्के
  • बँक ऑफ बडोदामध्ये 63.97 टक्के हिस्सेदारी
  • कॅनेरा बँकेत सरकारचा वाटा 62.93 टक्के
  • पंजाब नॅशनल बँकेत हा वाटा 73.15 टक्के
  • इंडियन बँकेमध्ये सरकारचा हिस्सा 79.86 टक्के
  • युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 83.49 टक्के वाटा
  • बँक ऑफ इंडियामध्ये 81.41 टक्के हिस्सा
  • सेंट्रल बँक ऑफ इंडियात 93.08 टक्के हिस्सेदारी
  • बँक ऑफ महाराष्ट्रात हा वाटा 85 टक्के आहे
  • युको बँकमध्ये सरकारचा वाटा 95.39 टक्के
  • इंडियन ओव्हरसीज बँकेत 96.38 टक्के वाटा
  • पंजाब अँड सिंध बँकेत 98.25 टक्के हिस्सा

कोणत्या बँका आहेत सुरक्षित

  1. बँकिंग नियमामुळे भारतीय बँकिंग क्षेत्र सुरक्षित
  2. आरबीआयचे सर्वच बँकिंग क्षेत्रावर नियंत्रण
  3. सुरक्षित बँकेत दीर्घकाळापासून एसबीआयाचा पहिला क्रमांक
  4. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर खासगी बँक एचडीएफसी, आयसीआयसीआय
  5. चौथ्या आणि पाचव्या स्थानी पीएनबी आणि बँक ऑफ बडोदा

Follow Us
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक...
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ