AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalsampada Vibhag Jobs : जलसंपदा विभागात लागणार लॉटरी, होणार मेगा पदभरती

Jalsampada Vibhag Jobs : जलसंपदा विभागात तरुणांना लवकरच लॉटरी लागणार आहे. या विभागात मोठी पदभरती होऊ घातली आहे. त्यामुळे रिक्त जागांसाठी आताच तयारी करा.

Jalsampada Vibhag Jobs : जलसंपदा विभागात लागणार लॉटरी, होणार मेगा पदभरती
| Updated on: Jul 26, 2023 | 1:55 PM
Share

नवी दिल्ली | 26 जुलै 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागात लवकरच तरुणांना लॉटरी (Maharashtra Jalsampada Recruitment 2023)लागेल. त्यांना नोकरीची संधी मिळेल. या विभागात मोठ्या प्रमाणावर पद भरती होणार आहे. अनेक वर्षांपासून जलसंपदात नोकरीचे दार बंद आहे. 2013 मध्ये या विभागात पदभरती झाली होती. आता पुन्हा पद भरती होण्याची शक्यता आहे. पुढील महिना त्यादृष्टीने महत्वाचा आहे. या महिन्यात पदभरती होऊ शकते. त्यामुळे तरुणांनी आतापासूनच या पद भरतीची तयारी करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने याविषयीची अधिकृत माहिती दिली नसली तरी, जलसंपदा विभागात पद भरती होण्याची चर्चा रंगली आहे.

नोकर भरतीची चर्चा

राज्य सरकारच्या जलसंपदा विभागात अनेक दिवसांपासून पद भरती होण्याची चर्चा सुरु आहे. मध्यंतरी कोरोना काळात सर्वच प्रक्रिया थंड बस्त्यात गेल्या. पण आता निवडणुकांचा लवकरच हंगाम सुरु होईल. त्याअगोदर राज्य सरकार तरुणांना सरकारी नोकरी देण्याची तयारी करु शकते. यासंबंधीची अधिकृत कोणतीही माहिती नसली तरी नोकरी भरती करण्यात येणार ही चर्चा रंगली आहे.

इतक्या जागांसाठी भरती

जलसंपदा विभागात एकूण 16,185 जागांसाठी नोकर भरती होण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्य दिवसापूर्वी, अनेकांना या भरतीसाठी प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्ट 2023 रोजीपूर्वी याविषयीची अधिसूचना जारी होऊ शकते. या खात्यातील नोकर भरतीची प्रक्रिया लवकरच होईल.

सरळसेवा भरती

जलसंपदा विभागात गट क संवर्गात सरळसेवा पध्दतीने भरती होईल. एकूण 8,014 जागा सरळसेवा पद्धतीने भरण्यात येतील. तर पदोन्नतीने 3,163 जागांची भरती करण्यात येणार आहे. एकूण 16,185 जागांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे.

गट ड पदासाठी भरती

गट ड संवर्गातील जागा सरळसेवा पद्धतीने भरण्यात येतील. एकूण 4,702 जागा थेट पद्धतीने भरता येईल. 306 जागा पदोन्नतीने भरता येतील. एकूण 5,008 पदे भरण्यात येणार आहे. गट क आणि ड संवर्गातील मिळून सुमारे 16,185 जागांसाठी मेगा नोकर भरती करण्यात येईल.

अनुशेष भरुन निघणार

जलसंपदा विभागात 2013 पासून कोणतीही नोकर भरती झालेली नाही. त्यामुळे या विभागात रिक्त पदांचा अनुशेष वाढला आहे. लवकरच हा अनुशेष दूर करण्यात येईल, अशी शक्यता आहे.

कधी होईल पद भरती?

जलसंपदा विभागात नोकर भरती कधी होणार याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भरतीची अधिसूचना अजून जाहीर करण्यात आलेली नाही. पण 15 ऑगस्टपूर्वीच भरती प्रक्रिया राबविण्यात येऊ शकते, अशी शक्यता आहे.

Follow Us
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले....
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक... काय घडलं?
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं?
Girish Mahajan | ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं? भाजपच्या दिल्ली दरबारातून नाराजीची चर्चा!
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर
Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!