AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ 100 दलितांनी गाव सोडलं; तलावाजवळ मुक्काम, महाराष्ट्राला झालंय काय?

जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावतीतील 100 दलितांनी गाव सोडलं आहे. अवघ्या महाराष्ट्राला विचार करायला लावणारी ही घटना आहे. एकविसाव्या शतकात मानवाने प्रगतीचे इमले बांधले पण जातीयवादाची भिंत पाडण्यात त्याला कुठली अडचण येतीय, हे कळायला अद्याप मार्ग नाही.

जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ 100 दलितांनी गाव सोडलं; तलावाजवळ मुक्काम, महाराष्ट्राला झालंय काय?
AMRAVATI ATROCITIES
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 1:13 PM
Share

अमरावती : महाराष्ट्र कायम फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो पण आणखीही त्यांची शिकवण आचरणात का आणत नाही? हे विचारण्याचं कारण म्हणजे जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावतीतील 100 दलितांनी गाव सोडलं आहे. अवघ्या महाराष्ट्राला विचार करायला लावणारी ही घटना आहे. एकविसाव्या शतकात मानवाने प्रगतीचे इमले बांधले पण जातीयवादाची भिंत पाडण्यात त्याला कुठली अडचण येतीय, हे कळायला अद्याप मार्ग नाही.

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील जातीय द्वेषातून होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ दानापूर येथील शंभर दलितांनी शुक्रवारी गाव सोडून निषेध केला आहे. यावेळी या बांधवांनी गावालगतच्या पाझर तलावावर आपले ठाण मांडले असून, पून्हा गावात परतणार नाही असे निर्णय घेतला आहे.

त्यामुळे गावातील त्यांच्या मालमत्तेच्या सरक्षणाची जबाबदारी ही प्रशासनाची राहील असे त्यांनी लेखी प्रशासनाला कळविले आहे. आमच्यावरील अत्याचार कधीपर्यंत आम्ही सहन करणार, असा संतप्त सवाल करुन आता आम्हाला या गावात राहण्यास काडीमात्र रस नाही, असं गावकऱ्यांनी प्रशासनाला सांगितलं.

नेमका प्रकार काय?

दानापूर येथील दलित बांधवाची दानापूर शेत शिवारात शेती आहे. याच शिवारात मुख्य सरकारी पांदणाच्या एक शेत पलीकडे या दलितांची शेती आहे. परंतु गावच्या सवर्णांनी या दलितांना त्यांच्या शेतात जाणारा पिढीजात वहीवाटीचा रस्ताच बंद केला. त्यामुळे त्यांची मशागत व इतर शेती कामे खोळंबली. ऐन पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप दलित बांधवांचा आहे. गाव सोडून गेलेले सर्व लोक आता लंगतच्या पाझर तलावालगत थांबले आहे या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बीडमध्ये नववीतल्या मुलीचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

शाळेतून घरी परतत असताना नववीत शिकणाऱ्या मुलीची एका तरुणाने छेड काढली. अपमान सहन न झाल्याने मुलीने घरी येऊन विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील गुंदा वडगाव या गावात घडलीय. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बाळू खंदारे असं आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर पिंपळनेर पोलिस घटनास्थळी धाव घेतली मात्र पीडित मुलगी अद्याप शुद्धीवर आली नसल्याने पोलिसांना तिचा जवाब घेता आला नाही. या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे.

छेडछाडीला कंटाळून मुलीने विष घेतलं

15 वर्षीय मुलीची गावातीलच एक अल्पवयीन मुलगा छेड काढत होता. तिला पाहून इशारे करणे, कमेंट करणे अशा पद्धतीने तो त्रास देत होता. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी हाच प्रकार घडला. सततच्या छेडछाडीला कंटाळून मुलीने तिच्या घरी विषारी द्रव प्राशन केले. ही बाब आईच्या निदर्शनास आली, त्यानंतर तिला तातडीने बीडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या पीडितेवर उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब आघाव यांनी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान मुलगी जवाब देण्याच्या परिस्थितीत नसल्याने पोलिसांनी कुटुंबियांना धीर देत जवाब नोंदवून घेऊ असा विश्वास दिला आहे.

हे ही वाचा :

अमरावतीत आर्थित विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट समोर

8 ते 11 वर्षाच्या मुलांकडून 6 वर्षीय चिमुकलीसोबत भयावह कृत्य, आपली वाटचाल नेमकी कुठल्या दिशेला चाललीय?

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.