AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस असल्याचे सांगत चौकडीने 2.6 कोटींचे दागिने पळविले, हैदराबाद – सायन सर्कल ते भिवंडी पळवापळवी

जेव्हा हैदराबादचे हे ज्वेलर आपल्या कारागिरासह त्यांच्या क्लायंटकडे इनोवा कारमधून बीकेसीला भारत डायमंडकडे निघाले असता त्यांच्या इनोवा कारला दुसऱ्या कारने ब्लॉक केले.

पोलीस असल्याचे सांगत चौकडीने 2.6 कोटींचे दागिने पळविले, हैदराबाद - सायन सर्कल ते भिवंडी पळवापळवी
मीरारोडमध्ये असे काय घडले?Image Credit source: socialmedia
| Updated on: Jun 02, 2023 | 4:59 PM
Share

मुंबई : दिल्ली क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगत सायन सर्कलला उतरलेल्या हैदराबादच्या एका ज्वेलर्स आणि त्याच्या कारागिरांच्या इनोवा कारला एका चौकडी घेरले. त्यांचे अपहरण करीत त्यांना भिंवडीला नेत त्यांच्याकडील दोन किलोचे सोने आणि हिरे असा 2.6 कोटींचा ऐवजही या चौकडीने भर दिवसा पळविल्याची खळबळजनक घटना बुधवारी घडली. या प्रकरणी मुंबई पोलीसांनी समांतर पथके स्थापन करुन तपास सुरू केला आहे.

हैदराबादचे ज्वेलर्स संतोष नरदी आणि त्यांच्यासाठी काम करणारे हरीराम घोटीया मुंबईला कच्चे सोने आणि हिरे घेऊन मुंबईत सायन सर्कलला खाजगी लक्झरी बसने उतरले. ते नेहमीच कच्चे सोने घेऊन हैदराबादहून मुंबईत येतात आणि दागिने तयार करून पुन्हा हैदराबादला नेत असतात.

जेव्हा हैदराबादचे हे कारागिर त्यांच्या क्लायंटकडे इनोवा कारमधून बीकेसीला भारत डायमंडकडे निघाले असता त्यांच्या इनोवा कारला दुसऱ्या कारने ब्लॉक केले. त्यावेळी त्या कारमधून दोघे जण उतरले आणि त्यांनी आपण दिल्ली क्राईम ब्रॅंचमधून आलो आहोत, आम्हाला तुमच्याकडील सामानाची झडती घ्यायची आहे असे त्यांनी सांगितले. घोटीया यांनी यात सोने असल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी याची कागदपत्रे दाखवा अशी मागणी केली. आम्ही तुम्हाला दिल्ली घेऊन चाललो आहोत असे सांगत त्यांनी त्यांनी भिवंडीला नेले, तेथे त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडील 2.6 कोटीचा मुद्देमाल घेऊन ते पसार झाले. या प्रकरणातील आरोपींना या ज्वेलर्सच्या सर्व घडामोडी माहीती असल्याने त्यांना ज्वेलर्सच्या ओळखीतल्या लोकांनीच टीप दिली असावी असा सायन पोलीसांना संशय आहे. त्यादृष्टीने या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.