AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 राज्यं, 12 दिवस पाठलाग… 380 कोटींची फसवणूक करणाऱ्याला अखेर अटक, अभिनेता अनू कपूर यांचीही केली होती फसवणूक

गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल 380 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला थरारक पाठलागानंतर पोलिसांनी अटक केली आहे. अंबर दलाल असे आरोपीचे नाव असून गेल्या 12 दिवसांपासून पोलिस त्याचा 3 राज्यात पाठलाग करत होते.

3 राज्यं, 12 दिवस पाठलाग... 380 कोटींची फसवणूक करणाऱ्याला अखेर अटक, अभिनेता अनू कपूर यांचीही केली होती फसवणूक
12 दिवस पाठलाग करून आरोपीला अटक
| Updated on: Mar 29, 2024 | 8:46 AM
Share

गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल 380 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला थरारक पाठलागानंतर पोलिसांनी अटक केली आहे. अंबर दलाल असे आरोपीचे नाव असून गेल्या 12 दिवसांपासून पोलिस त्याचा 3 राज्यात पाठलाग करत होते. अखेर त्याला उत्तराखंडमधून बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपीने सुमारे एक हजार गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा संशय असून आतापर्यंत ६०० तक्रारदार पोलिसांकडे आले आहेत. त्यामध्ये अभिनेते अनु कपूर यांचाही समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर आरोपी अंबर दलाल मुंबईतून फरार झाला. तेथून पळाल्यानंतर तो गुजरात, राजस्थान व उत्तराखंडमध्ये वास्तव्य करत होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली.

काय आहे प्रकरण ?

ओशिवरा पोलिसांनी १५ मार्च रोजी रिट्झ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे मालक दलाल यांच्याविरुद्ध सुरुवातीला डझनभर गुंतवणुकदारांची ५४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. जुहू येथील फॅशन डिझायनर बबिता मलकानी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तक्रारदारांची संख्या वाढली. त्यामुळे फसवणुकीची रक्कम ३८० कोटी रुपये झाली आहे. आतापर्यंत ६०० तक्रारदार पोलिसांकडे आले आहेत.

फिर्यादींच्या तक्रारीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये एका मैत्रिणीने तिची ओळख अंबर दलालशी करून दिली. त्याने तिला गुंतवणुकीवर आकर्षक नफ्याचे आमिष दाखवले. तसेच देऊ केला. तसेच दर महिन्याला १.५ ते १.८ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पैसे काही परत मिळाले नाहीत. याप्रकरणी गुन्हा दाखल होणाच्या एक दिवस आधीच म्हणजे १४ मार्च रोजी अंबर दलाल हा फरार झाला. पोलिसांनी जुहू, अंधेरी व दहिसर परिसरात त्याचा पोलिसांनी शोध घेतला. पण तोपर्यंत दलाल गुजरातला पळाला होता. त्याच्या मागावर पोलीस पथक गुजरातला गेले. काही दिवस गुजरातमध्ये राहिल्यानंतर आरोपी राजस्थानला पळाला. तेथून तो उत्तराखंड येथे पळाला. या काळात त्याने सहा हॉटेलमध्ये वास्तव्य केले होते. अखेर पोलिसांनी उत्तराखंडमधून त्याला बेड्या ठोकल्या.

Follow Us
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी आंदोलनावर अखेर राहुल गांधींनी सोडलं मौन
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत...
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल;
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल; लेकाची प्रकृती खालावल्याचं कळताच...
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी..
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी संजय राऊत मैदानात, पहा व्हिडीओ
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता