AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Boy Drowned : उल्हास नदीत बुडून शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू, मित्रासोबत पोहायला गेला असता घडली घटना

नदीच्या पात्रामध्ये उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात वाहून जाऊ लागला. त्याचा मित्र शर्मा याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला यश आले नाही.

Kalyan Boy Drowned : उल्हास नदीत बुडून शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू, मित्रासोबत पोहायला गेला असता घडली घटना
बंधाऱ्यात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यूImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Aug 26, 2022 | 10:51 PM
Share

कल्याण : शाळेच्या नावाखाली मित्रासोबत उल्हास नदी (Ulhas River)त पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्या (School Student)चा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. सूर्यदेव संतराज यादव असे बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो उल्हासनगरमधील सेंचुरी हायस्कूलमध्ये शिकत होता. मयत विद्यार्थी शाळेत जातो सांगून घरुन निघाला. मात्र शाळेत न जाता वर्गमित्रासोबत नदीवर पोहायला गेला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. चार तास अथक प्रयत्न केल्यानंतर अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. याप्रकरणी अधिक तपास टिटवाळा पोलीस करत आहेत.

घरी शाळेत जातो सांगून मित्रासोबत पोहायला गेला

मयत सूर्यदेव कल्याणमधील धोबीघाट येथील राहणारा असून, शाळेत जातो सांगून वर्गमित्र आयर्न शर्मासोबत पावशेपाडा येथे उल्हास नदीत सकाळी 11 वाजता पोहण्यासाठी गेला होता. सूर्यदेव हा नदीच्या पात्रामध्ये उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात वाहून जाऊ लागला. त्याचा मित्र शर्मा याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला यश आले नाही. त्याने बराच आरडाओरडा केला परंतु तो परिसर निर्जन असल्यामुळे मदतीला कुणीच आले नाही. त्यामुळे तो धावत म्हारळ पोलीस चौकित गेला आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली.

पोलिस आणि समाजसेवक विवेक गंभीरराव यांनी तेथे जाऊन स्थानिकांच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाने चार अथक प्रयत्न करुन मुलाचा शोध असता दुपारी 3 च्या दरम्यान सूर्यदेवचा मृतदेह नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आला. (A school student who went swimming drowned in Ulhas river)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.