AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘काळ्या मुलीशी लग्न करुन पस्तावलो’ म्हणत त्यानं बायकोला घराबाहेर काढलं आणि पुढे…

लग्नासाठी प्रत्येक मुलाला गोरी मुलगी कुठून आणायची रे बाबा..? असा प्रश्न उपस्थित करणारी संतापजनक घटना

'काळ्या मुलीशी लग्न करुन पस्तावलो' म्हणत त्यानं बायकोला घराबाहेर काढलं आणि पुढे...
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 24, 2022 | 2:15 PM
Share

‘गोराही म्हणतो गोरी पाहिजे, काळाही म्हणतो गोरी, आता तुम्हीच सांगा पाव्हणं कुठं जातील काळ्या पोरी’ हे प्रल्हाद शिंदे यांचे प्रसिद्ध गीत आजच्या युगातही तितकंच खरं ठरतंय. कारण अशीच एक घटना समोर आली आहे. लग्नाच्या 3 वर्षांनी एका पतीने आपल्या पत्नीला घरातून हाकलवून दिलं. तिचा रंग काळा (Black colour) आहे म्हणून पतीने हे संतापजनक कृत्य केल्याचा आरोप करण्यात आलाय. इतकंच नाही तर त्यानंतर त्याने एक गोरी मुलगी शोधली आणि तिच्याशी लग्न (Marriage Dispute) केलं. ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. पश्चिम बंगालच्या (West Bengal Crime) पुरुलिया इथं उघकीस आलेल्या आलेल्या या प्रकराने सगळ्यांनाच धक्का बसलाय.

याप्रकरणी पीडित पत्नीने आपल्या पतीविरोधात लेखी तक्रारही दाखल केली. सध्या या घटनेची पोलिसांकडून अधिक चौकशी केली जाते आहे. या प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडालीय. प्रत्येक मुलाला लग्नासाठी गोरी मुलगी आणायची कुठून, असा प्रश्नही आता काहींनी उपस्थित केलाय.

भारतवर्षचे प्रतिनिधी अजय विद्यार्थी यांनी दिलेल्या वृत्तानुसार, 3 वर्षांपूर्वी एका दाम्पत्याचं लग्न झालं होतं. पण तीन वर्षांनंतर पतीला वाटलं की आपली पत्नी काळी आहे. त्यामुळे आपण तिच्यासोबत नाही राहू शकत. अखेर त्यानं दुसऱ्या एका गोऱ्या मुलीशी लग्न करुन तिला घरी आणलं आणि आपल्या पहिल्या पत्नीला घराबाहेर काढलं.

पहिल्या लग्नावेळी घेतला हुंडा

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याच्या लग्नावेळी नवऱ्या मुलाने हुंडाही घेतला होती. सोनं-चांदी आणि 85 हजार रुपयांची रोकडही मुलीकडच्यांनी हुंड्याच्या रुपात दिले होती, असं सांगितलं जातंय. यातील पीडित पत्नीचं नाव अर्शा इलाके असं आहे, तर आरोपी पतीचं नाव राजू महतो असं आहे.

तक्रारीत काय?

पीडित पत्नीला घरातून बाहेर काढल्यानंतर तिने पोलीस स्थानक गाठलं आणि लेखी तक्रार दिली. पीडितेने आपल्या पतीसह सासरच्या सहा लोकांविरोधात तक्रार दाखल केलीय. याप्रकरणी आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी पीडितेनं केलीय.

पीडितेचे वडील आता जिवंत नसून तिच्या माहेरच्या लोकांची आर्थिक स्थितीही चिंताजनक आहे. शिवाय माहेरी ती आपलं उरलेलं आयुष्य नाही घालवू शकत, असंही तिने म्हटलंय. लग्नानंतर पती माझ्याकडे सारखा पैशांची मागणी करत होता, असाही आरोपी पीडितेनं केलं आहे.

कामावर जाण्याचा बहाणा करुन त्याने पीडितेच्या भावांकडून पैसे घेतल्याचंही तक्रारीत म्हटलंय. दरम्यान, याप्रकरणी पतीचं नेमकं म्हणणं काय आहे, हे समोर आलेलं नाही. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. संशयित आरोपींची कसून चौकशी करुन पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलंय.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.