AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जावई सासूशी लग्न करून पोहोचला गावात, मुलाच्या पत्नीला पाहून वडील म्हणाले ‘आता तू…’

Aligarh Saas damad News: सध्या सासू आणि जावयाची प्रेम कहाणी चर्चेत आहे. दोघांनीही पळून जाऊन लग्न केले आहे. आता जावई पत्नीला घेऊन घरी पोहोचला आहे. गावकऱ्यांनी त्यांचे ज्या प्रकारे स्वागत केल ऐकून बसेल धक्का

जावई सासूशी लग्न करून पोहोचला गावात, मुलाच्या पत्नीला पाहून वडील म्हणाले 'आता तू...'
AligadhImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 20, 2025 | 1:08 PM
Share

सध्या उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये फक्त एकाच प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. ती जावई आणि सासूची प्रेमकथा आहे. एका कलियुगातील आईचा तिच्या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यावर जीव आला. ती तिच्या जावयासोबतच घरातून पळून गेली. १० दिवसांनी पोलिसांनी त्यांना पकडले आणि चौकशी केली तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. शेवटी, पोलिसांनी सासू आणि जावई दोघांना सोडले. आता जेव्हा राहुल त्याच्या नवीन वधूसोबत, म्हणजेच सासूसोबत घरी पोहोचला, तेव्हा गावकऱ्यांनी भयानक पद्धतीने स्वागत केले.

नेमकं प्रकरण काय?

हे प्रकरण अलीगढच्या मद्रक पोलिस ठाण्याचे आहे. येथील एका गावात राहणारा जितेंद्र कुमार बंगळुरूमध्ये काम करतो. काही महिन्यांपूर्वी त्याने त्याची मुलगी शिवानीचे लग्न राहुलशी ठरवले होते. मुलीच्या लग्नासाठी वडिलांनी ५ लाख रुपयांचे दागिने तयार केले होते आणि ३ लाख ५० हजार रुपयांची व्यवस्थाही केली होती. पण राहुल त्याच्या सासू अनिता उर्फ ​​सपना उर्फ ​​अपना देवी हिच्या प्रेमात पडला होता. अशा परिस्थितीत दोघांनीही एक योजना आखली आणि पळून गेले. पळून जाण्यापूर्वी, महिलेने तिच्या मुलीच्या लग्नासाठी बनवलेले दागिने आणि तिने वाचवलेले पैसेही चोरले. कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी दोघांनाही अटक केली तेव्हा सासूने सांगितले की जितेंद्र तिला मारहाण करायचा. यासोबतच त्यांच्या लग्नाच्या बातम्याही समोर आल्या. आता पोलिसांनी दोघांनाही सोडले आहे.

वाचा: लग्नाच्या आधी नवरीची डेंजर अट, मैत्रिणींना आधी बसला धक्का नंतर लाजून…

गावकऱ्यांनी केले स्वागत

सासूसोबत पळून गेलेला जावई राहुलची कहाणी संपत नाहीये. शनिवारी पोलिसांकडून सुटका होताच, राहुल त्याच्या पत्नीसोबत घरी पोहोचला. पण राहुलचे वडील आणि गावकरी आधीच तिथे तयार उभे होते. अपना देवी आणि राहुल गाडीतून उतरताच गावकऱ्यांनी त्यांना हाकलून लावले. हातात विटा आणि झाडू घेऊन उभे असलेल्या गावकऱ्यांनी नववधूला शिव्या देऊन त्यांचे स्वागत केले. त्याच वेळी, वडिलांनी दोघांनाही गाडीतून गावाच्या मातीवर पाय ठेवण्यास मनाई केली. त्यांनी सांगितले की, दोघांनीही केवळ त्यांच्या कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण गावाची इज्जत घालवली आहे.

वडिलांनी धमकी दिली

राहुलचे वडील ओमवीर म्हणाले की, त्यांचे मुलगा आणि पत्नीशी कोणतेही संबंध नाहीत. तसेच त्यांना राहुलचा चेहराही पहायचा नाही. ओमवीरने त्यांचा मुलगा राहुलला धमकी दिली आणि पुन्हा या गावात येऊ नको. दुसरीकडे, पोलिस स्टेशन आणि समुपदेशन केंद्रात, राहुल आणि अपना देवी यांना पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले. अपना देवीच्या धाकट्या मुलानेही तिला मिठी मारली आणि घरी परतण्याची विनंती केली. तरीही, देवीने हार मानली नाही आणि स्पष्टपणे म्हणाली की ती आता राहणार असेल तर फक्त राहुलसोबतच. राहुलनेही आपल्या पत्नीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने सांगितले की त्याने लग्न केले आहे.

Follow Us
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...