मनसुख हिरेन आत्महत्येप्रकरणी बुकीसह दोन जणांना अटक, एटीएसची मोठी कारवाई

मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यूप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. (ATS arrested two person in mansukh hiren suicide case)

मनसुख हिरेन आत्महत्येप्रकरणी बुकीसह दोन जणांना अटक, एटीएसची मोठी कारवाई
mansukh hiren
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 11:33 AM

मुंबई: मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यूप्रकरणी बुकीसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या दोघांचा या हत्येत हात असल्याचा दावा करण्यात येत आहे. हिरेन हत्येप्रकरणात पहिल्यांदाच अटक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी माहिती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (ATS arrested two person in mansukh hiren suicide case)

मनसुख हिरेनप्रकरण कालच एनआयएकडे देण्यात आलं आहे. त्यानंतर आज एटीएसने या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. या दोघांचा हिरेन मृत्यूप्रकरणात हात असल्याचं बोललं जात आहे. आता या दोघांचा ताबा एनआयएकडे देण्यात येणार आहे. एटीएसने नरेश धारे आणि विनायक शिंदे या दोघांना अटक केली आहे. धारे हा बुकी असून शिंदे हे पोलीस दलात होते. मात्र त्यांना निलंबित करण्यात आलं होतं, असं सूत्रांनी सांगितलं. या दोन जणांना अटक केल्यानंतर हिरेन प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

25 जणांचे जबाब नोंदवले

हिरेनप्रकरणी एटीएसने आतापर्यंत 25 लोकांचे जबाब नोंदवले आहेत. त्यातून बरेच धागेदोरे एटीएसच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोण आहेत मनसुख हिरेन?

मनसुख हिरेन यांनी जे प्रतिज्ञापत्र पोलीसात दाखल केलं आहे आणि विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी जे वाचून दाखवलं त्यानुसार- मनसुख हिरेन हे ऑटोमोबाईलच्या स्पेअर पार्टचा व्यवसाय करत होते. तीन मुलं आणि पत्नीसह ते ठाण्यात रहात होते. पत्नीचं नाव विमला आहे. त्यांचं वय 43 वर्षे. तीनही मुलांची वय हे 13 ते 20 वर्षाच्या दरम्यान आहे. सध्याच्या ठिकाणी ते 2005 सालापासून रहात आहेत.

अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली होती. कारण जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. अंबानीच्या अँटेलिया बंगल्याजवळ 25 फेब्रुवारीला संशयित स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याने तपास यंत्रणा अलर्ट झाली होती. (ATS arrested two person in mansukh hiren suicide case)

संबंधित बातम्या:

शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये?, मोजक्याच नेत्यांशी चर्चा करणार; देशमुख दिल्लीला जाणार की नाही?

मुंबई पोलिसांना 100 कोटींचं टार्गेट तर महापालिकेचा आकडा किती असेल; मनसेचा सवाल

Parambir Singh Letter Live Updates | शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली, गृहमंत्री बदलणार?

(ATS arrested two person in mansukh hiren suicide case)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.