AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर दोन दिवसांनी नवरदेवाला एक फोन आला अन् तो घरातून गेला, मात्र पुन्हा परतलाच नाही; तरुणासोबत काय घडलं?

लग्न सोहळा संपन्न झाला, नववधूला घेऊन वरात सासरी आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवरदेवाला एक फोन आला आणि तो घरुन गेला. मात्र त्यानंतर तो कधीच परतला नाही.

लग्नानंतर दोन दिवसांनी नवरदेवाला एक फोन आला अन् तो घरातून गेला, मात्र पुन्हा परतलाच नाही; तरुणासोबत काय घडलं?
लग्नानंतर दोन दिवसातच नवरदेवाचा मृत्यूImage Credit source: Google
| Updated on: Jun 02, 2023 | 10:40 AM
Share

गया : बिहारमधील गयामध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतर दोनच दिवसात नववधूवर विधवा होण्याची वेळ आली आहे. लग्नाच्या दोनच दिवसानंतर नवदरेवाला एक फोन आला आणि तो घरातून निघून गेला. मात्र त्यानंतर थेट त्याचा मृतदेहच नाल्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गुरुआ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. अशोक कुमार असे हत्या झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. अशोक कुमारला नेमका कुणाचा फोन आला?, त्याची हत्या कुणी आणि कोणत्या कारणासाठी केली? याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.

लग्नानंतर दोन दिवसांनी घरुन गेला तो परतलाच नाही

पलुहारा पंचायतीच्या लकराही गावात राहणारा अशोक यादव हा व्यवसायाने कंत्राटदार होते. अशोकचे 29 मे रोजी लग्न होते आणि 30 मे रोजी वरात घरी आली. त्यानंतर 31 मे रोजी सायंकाळपासून ते बेपत्ता झाले. 31 मे रोजी संध्याकाळी कोणीतरी त्याला त्याच्या मोबाईलवर कॉल केला, त्यानंतर तो निघून गेला. परंतु त्यानंतर तो परतलाच नाही. दरम्यान, गुरुवारी पहाटे त्याचा मृतदेह गुनेरी पंचायतीच्या कालव्याच्या काठावर आढळून आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी विशेष टीम

मृतदेहावर अनेक ठिकाणी धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. घटनास्थळावरून मृताचा मोबाईल आणि एक दुचाकीही सापडली आहे. अशोकची हत्या कोणी केली? का केली? याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत. शहर एसपीने हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी एक विशेष टीम तयार केली आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, लग्नानंतर दोनच दिवसांनी नवरदेवाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.