.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर दोन दिवसांनी नवरदेवाला एक फोन आला अन् तो घरातून गेला, मात्र पुन्हा परतलाच नाही; तरुणासोबत काय घडलं?

लग्न सोहळा संपन्न झाला, नववधूला घेऊन वरात सासरी आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवरदेवाला एक फोन आला आणि तो घरुन गेला. मात्र त्यानंतर तो कधीच परतला नाही.

लग्नानंतर दोन दिवसांनी नवरदेवाला एक फोन आला अन् तो घरातून गेला, मात्र पुन्हा परतलाच नाही; तरुणासोबत काय घडलं?
लग्नानंतर दोन दिवसातच नवरदेवाचा मृत्यूImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jun 02, 2023 | 10:40 AM
Share

गया : बिहारमधील गयामध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतर दोनच दिवसात नववधूवर विधवा होण्याची वेळ आली आहे. लग्नाच्या दोनच दिवसानंतर नवदरेवाला एक फोन आला आणि तो घरातून निघून गेला. मात्र त्यानंतर थेट त्याचा मृतदेहच नाल्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गुरुआ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. अशोक कुमार असे हत्या झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. अशोक कुमारला नेमका कुणाचा फोन आला?, त्याची हत्या कुणी आणि कोणत्या कारणासाठी केली? याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.

लग्नानंतर दोन दिवसांनी घरुन गेला तो परतलाच नाही

पलुहारा पंचायतीच्या लकराही गावात राहणारा अशोक यादव हा व्यवसायाने कंत्राटदार होते. अशोकचे 29 मे रोजी लग्न होते आणि 30 मे रोजी वरात घरी आली. त्यानंतर 31 मे रोजी सायंकाळपासून ते बेपत्ता झाले. 31 मे रोजी संध्याकाळी कोणीतरी त्याला त्याच्या मोबाईलवर कॉल केला, त्यानंतर तो निघून गेला. परंतु त्यानंतर तो परतलाच नाही. दरम्यान, गुरुवारी पहाटे त्याचा मृतदेह गुनेरी पंचायतीच्या कालव्याच्या काठावर आढळून आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी विशेष टीम

मृतदेहावर अनेक ठिकाणी धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. घटनास्थळावरून मृताचा मोबाईल आणि एक दुचाकीही सापडली आहे. अशोकची हत्या कोणी केली? का केली? याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत. शहर एसपीने हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी एक विशेष टीम तयार केली आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, लग्नानंतर दोनच दिवसांनी नवरदेवाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Follow Us
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत