AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर दोन दिवसांनी नवरदेवाला एक फोन आला अन् तो घरातून गेला, मात्र पुन्हा परतलाच नाही; तरुणासोबत काय घडलं?

लग्न सोहळा संपन्न झाला, नववधूला घेऊन वरात सासरी आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवरदेवाला एक फोन आला आणि तो घरुन गेला. मात्र त्यानंतर तो कधीच परतला नाही.

लग्नानंतर दोन दिवसांनी नवरदेवाला एक फोन आला अन् तो घरातून गेला, मात्र पुन्हा परतलाच नाही; तरुणासोबत काय घडलं?
लग्नानंतर दोन दिवसातच नवरदेवाचा मृत्यूImage Credit source: Google
| Updated on: Jun 02, 2023 | 10:40 AM
Share

गया : बिहारमधील गयामध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतर दोनच दिवसात नववधूवर विधवा होण्याची वेळ आली आहे. लग्नाच्या दोनच दिवसानंतर नवदरेवाला एक फोन आला आणि तो घरातून निघून गेला. मात्र त्यानंतर थेट त्याचा मृतदेहच नाल्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गुरुआ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. अशोक कुमार असे हत्या झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. अशोक कुमारला नेमका कुणाचा फोन आला?, त्याची हत्या कुणी आणि कोणत्या कारणासाठी केली? याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.

लग्नानंतर दोन दिवसांनी घरुन गेला तो परतलाच नाही

पलुहारा पंचायतीच्या लकराही गावात राहणारा अशोक यादव हा व्यवसायाने कंत्राटदार होते. अशोकचे 29 मे रोजी लग्न होते आणि 30 मे रोजी वरात घरी आली. त्यानंतर 31 मे रोजी सायंकाळपासून ते बेपत्ता झाले. 31 मे रोजी संध्याकाळी कोणीतरी त्याला त्याच्या मोबाईलवर कॉल केला, त्यानंतर तो निघून गेला. परंतु त्यानंतर तो परतलाच नाही. दरम्यान, गुरुवारी पहाटे त्याचा मृतदेह गुनेरी पंचायतीच्या कालव्याच्या काठावर आढळून आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी विशेष टीम

मृतदेहावर अनेक ठिकाणी धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. घटनास्थळावरून मृताचा मोबाईल आणि एक दुचाकीही सापडली आहे. अशोकची हत्या कोणी केली? का केली? याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत. शहर एसपीने हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी एक विशेष टीम तयार केली आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, लग्नानंतर दोनच दिवसांनी नवरदेवाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.