AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर दोन दिवसांनी नवरदेवाला एक फोन आला अन् तो घरातून गेला, मात्र पुन्हा परतलाच नाही; तरुणासोबत काय घडलं?

लग्न सोहळा संपन्न झाला, नववधूला घेऊन वरात सासरी आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवरदेवाला एक फोन आला आणि तो घरुन गेला. मात्र त्यानंतर तो कधीच परतला नाही.

लग्नानंतर दोन दिवसांनी नवरदेवाला एक फोन आला अन् तो घरातून गेला, मात्र पुन्हा परतलाच नाही; तरुणासोबत काय घडलं?
लग्नानंतर दोन दिवसातच नवरदेवाचा मृत्यूImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jun 02, 2023 | 10:40 AM
Share

गया : बिहारमधील गयामध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतर दोनच दिवसात नववधूवर विधवा होण्याची वेळ आली आहे. लग्नाच्या दोनच दिवसानंतर नवदरेवाला एक फोन आला आणि तो घरातून निघून गेला. मात्र त्यानंतर थेट त्याचा मृतदेहच नाल्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गुरुआ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. अशोक कुमार असे हत्या झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. अशोक कुमारला नेमका कुणाचा फोन आला?, त्याची हत्या कुणी आणि कोणत्या कारणासाठी केली? याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.

लग्नानंतर दोन दिवसांनी घरुन गेला तो परतलाच नाही

पलुहारा पंचायतीच्या लकराही गावात राहणारा अशोक यादव हा व्यवसायाने कंत्राटदार होते. अशोकचे 29 मे रोजी लग्न होते आणि 30 मे रोजी वरात घरी आली. त्यानंतर 31 मे रोजी सायंकाळपासून ते बेपत्ता झाले. 31 मे रोजी संध्याकाळी कोणीतरी त्याला त्याच्या मोबाईलवर कॉल केला, त्यानंतर तो निघून गेला. परंतु त्यानंतर तो परतलाच नाही. दरम्यान, गुरुवारी पहाटे त्याचा मृतदेह गुनेरी पंचायतीच्या कालव्याच्या काठावर आढळून आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी विशेष टीम

मृतदेहावर अनेक ठिकाणी धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. घटनास्थळावरून मृताचा मोबाईल आणि एक दुचाकीही सापडली आहे. अशोकची हत्या कोणी केली? का केली? याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत. शहर एसपीने हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी एक विशेष टीम तयार केली आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, लग्नानंतर दोनच दिवसांनी नवरदेवाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Follow Us
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर