AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांचं त्या बाईसोबत असलेलं नातं मुलांना खटकलं, अखेर मुलांनी ठरवून तसंच केलं; पण…

छत्तीसगडमध्ये चार वर्षांपूर्वी हत्येनं खळबळ उडाली होती. मुलांनी वडिलांची हत्या करून हत्या करून घटनास्थळावरून फरार झाले होते. अखेर पोलिसांनी तपास सुरु ठेवला आणि त्यांना बेड्या ठोकल्या.

वडिलांचं त्या बाईसोबत असलेलं नातं मुलांना खटकलं, अखेर मुलांनी ठरवून तसंच केलं; पण...
वडिलांचं होतं दुसऱ्या बाईसोबत लफडं, मुलांना कळताच त्यांनी केलं असं की...Image Credit source: freepik
| Updated on: Mar 02, 2023 | 4:02 PM
Share

छत्तीसगड : वडिल आणि एका बाईचं असलेलं कथित नातं ऐकून दोन्ही मुलांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. हे नातं दोन्ही मुलांना पसंत नव्हतं. त्यासाठी दोघांनी टोकाचा निर्णय घेतला आणि कट रचला. रक्ताच्या नात्याचा विचार न करता दोन्ही मुलांनी वडिलांचीच गळा दाबून हत्या केली. त्यानंतर दोन्ही मुलं फरार झाली. गेल्या चार वर्षांपासून पोलिसांना वारंवार आरोपी चकवा देत होते. तसेच त्या महिलेने आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांच्या पाठी तगदा लावला होता. अखेर चार वर्षानंतर पोलिसांनी मुंगेरमधून दोन्ही मुलांना अटक केली आहे. यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. छत्तीसगड पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या चापामधील जहांगीर गावात 11 डिसेंबर 2019 रोजी दोन्ही मुलांनी वडिलांची गळा दाबून हत्या केली होती. मृत वडिलांचे नाव धर्मवीर सिंह असं आहे. तर आरोपी असलेल्या दोन मुलांची नावं छोटू सिंह आणि संदीप सिंह अशी आहेत. या प्रकरणी प्रेमसंबंध असलेल्या महिलेनं पोलिसात तक्रार केली होती. सदर महिला प्रेमाखातर बिहारहून छत्तीसगडला पळून आली होती. यावेळी वडिलांचं आणि तिच्या संबंधांबाबत मुलांना कळलं आणि त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. वडिलांची हत्या करून दोन्ही मुलं फरार झाले होते.

महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, छोटू सिंह आणि संदीप सिंह यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी ती वारंवार पोलीस स्टेशन जाऊन माहिती घ्यायची.त्यानंतर तपास करताना छत्तीसगड पोलिसांनी मुंगेर पोलीस स्टेशनशी संपर्क केला आणि फरार आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतर 4 वर्षानंतर आरोपींना पकडण्यात यश आलं आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.