AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जावा-जावांच्या भांडणात अर्भकाचा बळी, चार दिवसांच्या बाळाला काकीने विहिरीत फेकलं

धाकट्या आणि मोठ्या जावांमधील मत्सर आणि हेवेदाव्यांमुळे 4 दिवसांच्या नवजात बालकाचा मृत्यू झाला. दोघांमध्ये इतके टोकाचे भांडण झाले, की काकीने बाळाला विहिरीत फेकले.

जावा-जावांच्या भांडणात अर्भकाचा बळी, चार दिवसांच्या बाळाला काकीने विहिरीत फेकलं
खेडमधील हत्येचे गूढ उकलले; सोन्याच्या दागिन्यांसाठी केली वृद्धाची हत्या
| Edited By: Anish Bendre | Updated on: Oct 06, 2021 | 1:59 PM
Share

रांची : जावा-जावांच्या भांडणात नवजात अर्भकाचा बळी गेल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतंच जगात पाऊल ठेवलेल्या अवघ्या चार दिवसांच्या बाळाची धाकट्या काकीने हत्या केली. छत्तीसगडमधील बालौदाबाजारात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

धाकट्या आणि मोठ्या जावांमधील मत्सर आणि हेवेदाव्यांमुळे 4 दिवसांच्या नवजात बालकाचा मृत्यू झाला. दोघांमध्ये इतके टोकाचे भांडण झाले, की काकीने बाळाला विहिरीत फेकले. बालोदाबाजार जिल्ह्यातील कासडोल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिकरी गावात हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला.

नेमकं काय घडलं?

संजना निषाद नावाच्या महिलेने तिच्याच मोठ्या दीर-जावेच्या 4 दिवसांच्या बाळाची निर्घृण हत्या केली. निष्पाप लेकराला अंगणात घातलेल्या खाटेवर झोपवून आई घरच्या कामात व्यस्त होती. जेव्हा ती परत आली, तेव्हा तिला बाळ अंथरुणावर कुठेच सापडले नाही. तिने इकडेतिकडे बाळाचा शोध घेतला, पण ते कुठेच न सापडल्यामुळे तिने ताबडतोब कासडोल पोलीस स्टेशन गाठले.

बाळाचा मृतदेह घराच्या अंगणातील विहिरीत

बाळ गायब झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. गावात अर्भकाचा शोध सुरु केला. शोधाशोध सुरु असताना मुलाचा मृतदेह घराच्या अंगणाला लागून असलेल्या विहिरीत आढळला. हा खून असल्याचं ताडायला कासडोल पोलिसांना जराही वेळ लागला नाही.

मत्सरापोटी निष्पाप लेकराचा बळी

संशयाच्या आधारावर बाळाची काकी संजनाची चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हत्येमागे जाऊबाईंचा मत्सर हे कारण तिने सांगितले. सध्या पोलीस आरोपी संजनाचा ताबा घेऊन तिला तुरुंगात पाठवण्याची तयारी करत आहेत.

भावालाही मुलगी झाल्याने वहिनीची हत्या

दुसरीकडे, अंगावर तेल फेकून विवाहितेची जाळून हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये समोर आली होती. धक्कादायक म्हणजे महिलेच्या नणंदेनेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले होते. भावालाही मुलगी झाल्यामुळे आता माहेरी आपल्या लेकीचे लाड कोण करणार? या असूयेच्या भावनेने नणंदेने वहिनीला जाळल्याचा आरोप होता.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील दातपडी गावात ही घटना घडली होती. विवाहितेच्या अंगावर तेल टाकून तिला जाळून मारल्याचा प्रकार समोर आला होता. मोनिका गणेश पवार असे मयत महिलेचे नाव होते. मोनिकाच्या नणंदेनेच तिची हत्या केली होती.

नेमकं काय घडलं?

पहिल्या मुलानंतर गणेश पवारला मुलगी झाली, मात्र भावाला मुलगी झाल्याने, माहेरी आता आपल्या मुलीचे लाड होणार नाहीत, या कारणामुळे आरोपी नणंद कांता संजय राठोड चरफडत होती. त्यामुळेच तिने तेल टाकून वहिनीला जाळून मारले, अशी तक्रार महिलेच्या नातेवाईकांनी केली होती. पांढरकवडा पोलिसांनी नणंद कांता राठोड हिच्याविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला होता.

संबंधित बातम्या :

भावालाही मुलगी झाली, आपल्या लेकीचे लाड कोण करणार? यवतमाळमध्ये नणंदेने वहिनीला जाळले

19 वर्षीय तरुणाचा राग, सोसायटीच्या दोन सुरक्षा रक्षकांनी पोटात चाकू खुपसला, मीरा भाईंदर हादरलं !

दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका