AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोवर विवाहबाह्य संबंधांचा संशय, नवऱ्याने चिमुकल्याचा जीव घेऊन बोअरवेलमध्ये फेकलं

आरोपी सिद्दप्पाने आपण या मुलाचे पिता असल्याचा इन्कार केला होता. पत्नी राजश्रीवर तो विवाहबाह्य संबंधांचा संशय घेत होता. याच रागातून त्याने चिमुकल्याची हत्या केली असावी, असा आरोप राजश्रीच्या आईने केला आहे

बायकोवर विवाहबाह्य संबंधांचा संशय, नवऱ्याने चिमुकल्याचा जीव घेऊन बोअरवेलमध्ये फेकलं
आरोपी बाप सिद्धप्पा
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 19, 2021 | 11:19 AM
Share

बेळगाव : बोअरवेलमध्ये अडीच वर्षांचा चिमुकला मृतावस्थेत सापडल्याने बेळगावात एकच खळबळ उडाली होती. मात्र चिमुकल्याच्या आईच्या कुटुंबीयांच्या आरोपानंतर त्याचा पिताच या प्रकरणातील प्रमुख संशयित ठरला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत बापाने आपल्या चिमुकल्याची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील अलकनूर गावात शनिवारी हा प्रकार घडला होता. अडीच वर्षांचा चिमुकला शुक्रवारी खेळताना बेपत्ता झाला होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका बोअरवेलमध्ये तो मृतावस्थेत आढळला होता.

नेमकं काय घडलं?

आरोपी सिद्दप्पाने आपण या मुलाचे पिता असल्याचा इन्कार केला होता. पत्नी राजश्रीवर तो विवाहबाह्य संबंधांचा संशय घेत होता. याच रागातून त्याने चिमुकल्याची हत्या केली असावी, असा आरोप राजश्रीच्या आईने केला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत सिद्दप्पाने कबुली दिली की आपणच बालकाचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह बोअरवेलमध्ये टाकला.

घरापासून 100 मीटर अंतरावरील बोअरवेलमध्ये मृतदेह

ऊसाच्या पिकांमध्ये असलेली बोअरवेल सिद्दप्पाच्या घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर आहे. चिमुकल्याचे अपहरण केल्याबद्दल विचारले असता सिद्दप्पा स्वतः पोलिसांना बोअरवेलकडे घेऊन गेला होता. पोलिसांनी सांगितले की ते जवळच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांसह सर्व बाजूंचा तपास करत आहेत.

लातूरमध्ये बापाकडून मुलीची हत्या

दुसरीकडे, दीड वर्षांच्या चिमुकल्या मुलीची वडिलांनीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार काही महिन्यांपूर्वी लातूरमध्ये उघडकीस आला होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पित्याने मुलीला मारहाण केली. त्यानंतर पाण्याच्या हौदात फेकून पित्याने पोटच्या पोरीचा जीव घेतला होता. लातूर जिल्ह्यातील आशीवमध्ये ही दुर्दैवी घटना घडली होती. पाण्यात बुडून चिमुकलीचा करुण अंत झाला. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली होती.

नेमकं काय घडलं होतं?

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी पिता संतोष भोंडे हा घरात पत्नी-मुलांना नेहमीच मारहाण करायचा. पत्नी आणि आई-वडील शेतावर गेल्यानंतर घरात मुले खेळत असताना आरोपीने दीड वर्षांच्या चिमुकलीला मारहाण केली आणि हौदात फेकून दिले. पाण्यात बुडाल्याने चिमुकलीचा मृत्यू झाला. घरी परतल्यावर मुलांनी आई आणि आजी-आजोबांना ही घटना सांगितली.

कोरोना संसर्गाने मृत्यूचा बनाव

दुसरीकडे, मनाविरुद्ध लग्न केल्याच्या कारणावरुन आई-वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशात समोर आली होती. तरुणीने मे महिन्यात लग्न केलं होतं, मात्र काही दिवसांनी माहेरी आल्यानंतर तिचा गूढ मृत्यू झाला. पोटदुखीमुळे मुलीची प्रकृती बिघडली, तिला कोरोना संसर्ग झाला आणि तिचा मृत्यू झाला, असं तिच्या आई-वडिलांनी नवऱ्याला खोटं कळवलं. अखेर पालकांनीच तिची हत्या केल्याचं समोर आलं.

संबंधित बातम्या :

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीकडून पोटच्या मुलीची पाण्याच्या हौदात बुडवून हत्या

डोक्यात दगड घालून अल्पवयीन मुलीची हत्या , बाथरूम शेजारी मृतदेह आढळल्याने खळबळ

लग्नासाठी नकार दिल्याने बापाकडून मुलीची हत्या, मृतदेह अर्धवट जळल्याने पुन्हा दफन

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली