AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खिडकीचे ग्रील कापले, पाण्याच्या टाकीवर गेल्या अन् शौचालयाच्या पाईपवरून उतरून पळाल्या; पनवेलमधून पाच मुलींनी असं केलं पलायन

पनवेलमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पनवेल बालसुधारगृहातून पाच मुलींनी पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुलींपैकी तिघा मुलींना शोधून काढले आहे.

खिडकीचे ग्रील कापले, पाण्याच्या टाकीवर गेल्या अन् शौचालयाच्या पाईपवरून उतरून पळाल्या; पनवेलमधून पाच मुलींनी असं केलं पलायन
panvel city police
| Updated on: Sep 30, 2025 | 6:07 PM
Share

पनवेलच्या बालसुधारगृहातून पाच मुली शौचालयाच्या पाईपवरुन उतरुन पळाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली होती. या प्रकरणाने खळबळ उडाली होती. त्यानंतर अपहरणाचा गुन्हा या प्रकरणात दाखल करण्यात आला.या मुलींना शोधण्यासाठी पनवेल शहर पोलिसांनी जंगजंग पछाडले. त्यानंतर नातेवाईक आणि इतर सूत्रांचा वापर करुन त्यातील तिघा मुलींना कसे तरी शोधून काढण्यात आले. त्यांनी या संदर्भात कबुली देताना पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे.

पनवेलमधील बालसुधारगृहातून पाच मुली पळून गेल्या असल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली होती. या संदर्भात पनवेल शहर पोलिसांनी १२ ते १७ वयोगटातील या मुलींचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल झाल्यानंतर,पनवेल शहर पोलिसांनी रेल्वे पोलिस आणि मुलींच्या नातेवाईकांच्या मदतीने काही तासांतच तीन मुलींना सुरक्षितपणे शोधून काढले. यावेळी मुलींनी धक्कादायक कारण सांगितले की त्यांना बालसुधारगृहात राहायचे नव्हते, म्हणूनच त्या स्वतः पळून गेल्या. तर अन्य दोन मुलींचा शोध सध्या सुरू आहे.

यावेळी पनवेल पोलिसांच्या इतर तपास यंत्रणांशी समन्वयामुळे शोध मोहीम यशस्वी झाली. पाचपैकी तीन मुली सापडल्या. त्यापैकी एक उरणमधील चिरनेर येथील तिच्या गावात सापडली. दुसरी मुलगी मुंबईतील वांद्रे येथील रेल्वे पोलिसांना सापडली. तिच्यासोबत कोणीही नसल्याने तिला डोंगरी येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तिसरी मुलगी सातारा जिल्ह्यातील तिच्या मूळ गावी पोहोचल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. सातारा पोलिसांनी या मुलीला जवळच्या बालसुधारगृहात ठेवण्याची कारवाई सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाच्या संदर्भात पोलिस इतर दोन मुलींचा शोध घेत आहेत.

मनाप्रमाणे रहाता येत नाही

बालसुधारगृहातून पळून गेलेल्या मुलींनी सांगितले की, पनवेलमधील मुलींच्या अनाथाश्रमाची एक मजली इमारत आहे. मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे अनाथाश्रमात राहण्याची परवानगी नव्हती, म्हणून त्यांनी पळून जाण्याचा कट रचला. त्यांनी सभागृहाच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल कापले, त्यानंतर त्या खिडकीबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढल्या. थोडे अंतर चालल्यानंतर, त्या शौचालयाच्या पाईपमधून जमिनीवरून खाली घसरत उतरल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत