AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खिडकीचे ग्रील कापले, पाण्याच्या टाकीवर गेल्या अन् शौचालयाच्या पाईपवरून उतरून पळाल्या; पनवेलमधून पाच मुलींनी असं केलं पलायन

पनवेलमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पनवेल बालसुधारगृहातून पाच मुलींनी पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुलींपैकी तिघा मुलींना शोधून काढले आहे.

खिडकीचे ग्रील कापले, पाण्याच्या टाकीवर गेल्या अन् शौचालयाच्या पाईपवरून उतरून पळाल्या; पनवेलमधून पाच मुलींनी असं केलं पलायन
panvel city police
| Updated on: Sep 30, 2025 | 6:07 PM
Share

पनवेलच्या बालसुधारगृहातून पाच मुली शौचालयाच्या पाईपवरुन उतरुन पळाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली होती. या प्रकरणाने खळबळ उडाली होती. त्यानंतर अपहरणाचा गुन्हा या प्रकरणात दाखल करण्यात आला.या मुलींना शोधण्यासाठी पनवेल शहर पोलिसांनी जंगजंग पछाडले. त्यानंतर नातेवाईक आणि इतर सूत्रांचा वापर करुन त्यातील तिघा मुलींना कसे तरी शोधून काढण्यात आले. त्यांनी या संदर्भात कबुली देताना पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे.

पनवेलमधील बालसुधारगृहातून पाच मुली पळून गेल्या असल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली होती. या संदर्भात पनवेल शहर पोलिसांनी १२ ते १७ वयोगटातील या मुलींचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल झाल्यानंतर,पनवेल शहर पोलिसांनी रेल्वे पोलिस आणि मुलींच्या नातेवाईकांच्या मदतीने काही तासांतच तीन मुलींना सुरक्षितपणे शोधून काढले. यावेळी मुलींनी धक्कादायक कारण सांगितले की त्यांना बालसुधारगृहात राहायचे नव्हते, म्हणूनच त्या स्वतः पळून गेल्या. तर अन्य दोन मुलींचा शोध सध्या सुरू आहे.

यावेळी पनवेल पोलिसांच्या इतर तपास यंत्रणांशी समन्वयामुळे शोध मोहीम यशस्वी झाली. पाचपैकी तीन मुली सापडल्या. त्यापैकी एक उरणमधील चिरनेर येथील तिच्या गावात सापडली. दुसरी मुलगी मुंबईतील वांद्रे येथील रेल्वे पोलिसांना सापडली. तिच्यासोबत कोणीही नसल्याने तिला डोंगरी येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तिसरी मुलगी सातारा जिल्ह्यातील तिच्या मूळ गावी पोहोचल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. सातारा पोलिसांनी या मुलीला जवळच्या बालसुधारगृहात ठेवण्याची कारवाई सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाच्या संदर्भात पोलिस इतर दोन मुलींचा शोध घेत आहेत.

मनाप्रमाणे रहाता येत नाही

बालसुधारगृहातून पळून गेलेल्या मुलींनी सांगितले की, पनवेलमधील मुलींच्या अनाथाश्रमाची एक मजली इमारत आहे. मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे अनाथाश्रमात राहण्याची परवानगी नव्हती, म्हणून त्यांनी पळून जाण्याचा कट रचला. त्यांनी सभागृहाच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल कापले, त्यानंतर त्या खिडकीबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढल्या. थोडे अंतर चालल्यानंतर, त्या शौचालयाच्या पाईपमधून जमिनीवरून खाली घसरत उतरल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Follow Us
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.