AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापानं फक्त एक प्रश्न विचारला, मुलगी रागाने लाल; रात्री केलं भयानक कृत्य; अख्खं कुटुंब…

जळगावमध्ये एक धक्कादाक घटना घडली आहे. एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचललं आहे.

बापानं फक्त एक प्रश्न विचारला, मुलगी रागाने लाल; रात्री केलं भयानक कृत्य; अख्खं कुटुंब...
jalgaon crime news (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
| Updated on: Jun 19, 2025 | 4:58 PM
Share

Jalgaon Suicide News : अल्पवयीन मुलं कधी काय करतील हे याचा नेम नाही. आजकालच्या मुलांना तणाव सहन होत नाहीये. ती शीग्रॅकोपी झाली आहेत. थोडंजरी रागवलं तर आजकालची मुलं टोकाचा निर्णय घ्यायला मागेपुढे पाहात नाहीत. दरम्यान, जळगावमध्ये त्याचीच प्रचिती देणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री घरी यायला उशीर का झाला? असं रागात विचारल्यामुळे एका 16 वर्षांच्या मुलीने थेट जीवन संपवलं आहे. मुलीच्या या धक्कादायक कृत्यामुळे एकच खळबळ उडाली असून अख्खं कुटुंब सुन्न झालं आहे.

नेमकं प्रकरण काय?

जळगावातील खेडी गावात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. घरी उशिरा आल्याच्या कारणावरून वडिलांनी रागावल्याने व किरकोळ मारहाण केल्याने संतापाच्या भरात मुलीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रात्री थेट विहिरीवर जाऊन संपलं जीवन

ही अल्पवयीन मुलगी रात्री 8 वाजता घरी परतली होती. घरात आल्यानंतर वडिलांनी तिला एवढ्या उशिरा का आली? अस विचारलं. तसेच किरकोळ मारहाण करत तिला रागावले. याचाच राग या अल्पवयीन मुलीला आला. त्यानंतर कुणाला काहीही न सांगता ती थेट घरातून निघून गेली. घरापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत तिने उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलीने कसलाही विचार न करता थेट जीवन संपवल्यामुळे दु:ख व्यक्त केलं जातंय. तर मृत मुलीपश्चात तिच्या घरी आई, वडील, दोन बहिणी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुलांना समजून घ्यावे, केले जातेय आवाहन

दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर मुलांनी ताणतणाव सहन करण्यासाठी तसेच त्यातून मार्ग करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मुलं तणावात दिसत असली किंवा त्यांच्याकडून काही चुका झाल्यास रागात न येता मुलांना समजावून सांगावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Follow Us
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले...
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले....
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.