AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलापुरात मर्सिडीज कारने फेरीवाल्यांना उडवलं!, संतप्त जमावाकडून कारचालकाला चोप

बदलापूर पश्चिमेच्या मुख्य बाजारपेठेतील खाऊगल्लीत दिवाकर शेट्टी हा इसम वास्तव्याला आहे. आज दुपारच्या सुमारास शेट्टी हा त्याच्या मर्सिडीज कारने या गल्लीतून जात असताना त्याने 3 ते 4 फेरीवाल्यांना उडवलं.

बदलापुरात मर्सिडीज कारने फेरीवाल्यांना उडवलं!, संतप्त जमावाकडून कारचालकाला चोप
मर्सिडीज कारने फेरीवाल्यांना उडवलंImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 14, 2023 | 4:35 PM
Share

बदलापूर : बदलापूरमध्ये एका मर्सिडीज कारने फेरीवाल्यांना उडवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बदलापूर पश्चिमेच्या रेल्वे स्थानकाबाहेरील मुख्य बाजारपेठेत आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत फेरीवाले जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने मर्सिडीज कार चालकाला बेदम चोप दिला आहे. दिवाकर शेट्टी असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. मारहाणीत कार चालकही जखमी झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

बदलापूर पश्चिमेतील खाऊगल्लीत घडली घटना

बदलापूर पश्चिमेच्या मुख्य बाजारपेठेतील खाऊगल्लीत दिवाकर शेट्टी हा इसम वास्तव्याला आहे. आज दुपारच्या सुमारास शेट्टी हा त्याच्या मर्सिडीज कारने या गल्लीतून जात असताना त्याने 3 ते 4 फेरीवाल्यांना उडवलं.

संतप्त जमावाकडून कार चालकाला बेदम चोप

या अपघातात फेरीवाले जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. यानंतर संतप्त जमावाने दिवाकर शेट्टी याला बेदम चोप दिला. यामध्ये दिवाकर शेट्टी हा सुद्धा जखमी झाला, पोलिसांनी त्यालाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु

दरम्यान, दिवाकर शेट्टी आणि हे फेरीवाले यांचे पूर्वीचे वाद असून, याच वादातून शेट्टी याने फेरीवाल्यांना उडवल्याची या परिसरात चर्चा आहे. मात्र या सगळ्याचा तपास सुरू असून तपासाअंती या घटनेचं नेमकं कारण समोर येईल, अशी माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.