AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलापूरच्या आंदोलनानंतर अफवांचे पीक, आक्रमक पोलिसांची धडक कारवाई, चौघांवर गुन्हे दाखल, तरुणीला अटक

Mumbai Crime News: दोन दिवसांपूर्वी, बदलापूरमधील अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईच्या प्रकृतीबद्दल खोटी माहिती पसरवणारा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोस्ट टाकल्याबद्दल २१ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. ठाणे सायबर सेलने तिचा शोध घेत तिच्यावर कारवाई केली.

बदलापूरच्या आंदोलनानंतर अफवांचे पीक, आक्रमक पोलिसांची धडक कारवाई, चौघांवर गुन्हे दाखल, तरुणीला अटक
बदलापूर अत्याचार प्रकरणी मंगळवारी आंदोलन करण्यात आले होते.Image Credit source: tv9
| Updated on: Aug 25, 2024 | 10:47 AM
Share

ठाणे जिल्ह्यातील बदलापुरात मंगळवारी मोठे जनआंदोलन उभारले गेले होते. बदलापुरातील एका नामांकीत शाळेत लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात तब्बल नऊ तास रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर बदलापूर शहरात सध्या अफवांचा सुळसुळाट सुरू असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर खोट्या पोस्ट टाकून अफवा पसरवल्या जात आहेत. अफवा पसरवणाऱ्या समाजकंटकांकडून समाजात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. समाजमाध्यमांवर खोटी पोस्ट व्हायरल केल्याबद्दल चार जणांवर गुन्हे दाखल केले आहे. तसेच या प्रकरणात एका तरुणीला अटक केली आहे.

आतापर्यंत पाच गुन्हे दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गुन्हे दाखल केलेल्या चार आरोपींनी बदलापुरातील घटनेशी संबंधित खोटी माहिती इंस्टाग्रामवर व्हायरल केली होती. त्यांनी पीडित कुटुंबाबद्दल धक्कादायक आणि खोटी माहिती पसरवली होती. यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दोन दिवसांपूर्वी, बदलापूरमधील अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईच्या प्रकृतीबद्दल खोटी माहिती पसरवणारा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोस्ट टाकल्याबद्दल २१ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. ठाणे सायबर सेलने तिचा शोध घेत तिच्यावर कारवाई केली.

बदलापुरात आंदोलनानंतर तणावपूर्ण शांतता

बदलापूर शहरात आंदोलनानंतर तणावपूर्ण शांतता आहे. मात्र, अफवांमुळे शहरात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. पोलिसांनी करडी नजर सोशल मीडियावर ठेवली आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन केले आहे.

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी बंद पुकारला होता. परंतु उच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर ठरवल्यामुळे मूक आंदोलन केले. त्यात शरद पवार, उद्धव ठाकरे सहभागी झाले होते.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.