AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Smuggle | शॉरमातून गोल्डबार, अंतर्वस्त्रातून सोन्याची पावडर, मुंबई विमानतळावर 18 केनियन महिला सापडल्या

केनियाच्या नागरिक असलेल्या 18 महिला नैरोबीहून (Nairobi) शारजामार्गे (Sharjah) भारतात आल्या होत्या. शॉरमा, कॉफीच्या बाटल्या, बूट यातून त्यांनी सोन्याचे लहान बार लपवून आणले होते.

Gold Smuggle | शॉरमातून गोल्डबार, अंतर्वस्त्रातून सोन्याची पावडर, मुंबई विमानतळावर 18 केनियन महिला सापडल्या
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 20, 2021 | 12:20 PM
Share

मुंबई : मुंबईतील कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (Air Intelligence Unit) 18 केनियन (Kenyan) महिलांना ताब्यात घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) रविवारी ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 1.55 कोटी रुपये किमतीचे 3.85 किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. शॉरमा (Shawarmas), कॉफीच्या बाटल्या, शूज यांच्यामधून सोन्याची तस्करी करण्यात येत होती. धक्कादायक म्हणजे काही जणींनी अंतर्वस्त्रातही पावडर स्वरुपात सोनं लपवलं होतं.

काय आहे प्रकरण?

केनियाच्या नागरिक असलेल्या 18 महिला नैरोबीहून (Nairobi) शारजामार्गे (Sharjah) भारतात आल्या होत्या. शॉरमा, कॉफीच्या बाटल्या, बूट यातून त्यांनी सोन्याचे लहान बार लपवून आणले होते. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या अंडरगारमेंट्समध्येही काही सोने सापडले. सर्व जणी एकाच फ्लाईटने प्रवास करत होत्या.

एका महिलेला अटक

एअर इंटेलिजन्स युनिटने आतापर्यंत एका महिलेला अटक केली आहे. परवानगीयोग्य मर्यादेपेक्षा अधिक सोने बाळगल्याबद्दल कारवाई करण्यात आली. तर उर्वरित 17 महिलांना ताब्यातील सोने जप्त करुन सोडून देण्यात आले. या महिला कुठल्याही स्मगलिंग रॅकेटचा भाग नसल्याचं आतापर्यंतच्या चौकशीत समोर आलं आहे.

जास्त दराने मुंबईत सोने विक्री

‘या महिला गरीब कुटुंबातील आहेत. केनियात सोन्याच्या किमती स्वस्त असल्याने तिथे त्यांनी सोनं विकत घेतलं होतं. मुंबईत सोन्याचे भाव प्रचंड जास्त असल्याने चढ्या दराने विकण्याचा त्यांचा प्लॅन होता’ असं सूत्रांनी सांगितलं.

तस्करी होणारे सोने बहुतांश वेळा दुबई किंवा शारजातील असते, मात्र आफ्रिकन देशांतूनही सोन्याच्या तस्करीचं प्रमाण वाढत आहे. गेल्याच महिन्यात दुबईहून 1.71 किलो वजनाचे 77 लाख रुपये किमतीचे सोने तस्कर केल्याप्रकरणी दोघा प्रवाशांना मुंबई विमानतळावर अडवण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

Doctor Murder | गरम जेवण वाढण्यावरुन वाद, दिराने डॉक्टर वहिनीचा जीव घेतला

भर लग्नमंडपातच नवरीमुलीकडच्यांनी नवऱ्याला आधी धू-धू धुतलं, नंतर पोलीस स्टेशनमध्येही खेचलं!

 मटण कापण्याच्या सुरीने पत्नीची हत्या, पतीची तलावात उडी, दाम्पत्यातील वादाचं कारण काय?

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?