AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळजाला हात घालणारी घटना, मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, वडिलांनाही अटॅक; घराचा आधारच गेला

मुलाने प्राण सोडल्याचं रिक्षात बसलेल्या त्या नरपथ जैन यांनी पहिले. मुलाला असं पडलेलं पाहून नरपथ यांना चक्कर आली आणि तेही खाली पडले.

काळजाला हात घालणारी घटना, मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, वडिलांनाही अटॅक; घराचा आधारच गेला
मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, वडिलांनाही आला अटॅकImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2022 | 4:23 PM
Share

विरार: मुंबईपासून हाकेच्या हाकेवर असलेल्या विरारमध्ये (virar) काळजाला हात घालणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. गरबा (garba) खेळत असताना मुलाला हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात जात असतानाच त्याचा मृत्यू (death) झाला. मुलाचा मृतदेह पाहून वडिलांनाही इतका मानसिक धक्का बसला की त्यांनीही जागीच प्राण सोडले. एकाचवेळी एकाच घरातील दोन कर्ते पुरुष गेले. त्यामुळे या कुटुंबावर प्रचंड शोककळा पसरली आहे. तसेच या दुर्देवी घटनेमुळे विरारमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटीतील अग्रवाल कॉमप्लेक्समधील एव्हरशाईन अव्हेन्यूमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. सोसायटीच्या आवारात मनिषकुमार नरपथ जैन (वय 35) हे गरबा खेळत होते. गरबा खेळत असतानाच मनिषकुमार यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तात्काळ रिक्षात टाकून विरारच्या संजीवनी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी रिक्षात मनिषकुमार यांचे वडील नरपथ हरिश्चंद्र जैन (65) हे बसलेले होते.

ही रिक्षा संजीवनी हॉस्पिटलच्या मेडिकल जवळ येताच मनिषकुमार हे रिक्षातून खाली पडले. मुलाने प्राण सोडल्याचं रिक्षात बसलेल्या त्या नरपथ जैन यांनी पहिले. मुलाला असं पडलेलं पाहून नरपथ यांना चक्कर आली आणि तेही खाली पडले. त्यामुळे दोघांनाही तात्काळ दवाखान्यात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी या दोघा बापलेकांना तपासून दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं.

जैन कुटुंबातील बापलेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सोसायटीतील रहिवाशांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे जैन कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात शून्य नंबरने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Follow Us
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा.
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा.
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला.
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून....
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून.....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....