AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसाला कानशीलात लगावणे दुचाकीस्वारांना महागात पडले; मुंबई कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

पोलिसाला कानशीलात लगावणाऱ्या दोघा दुचाकीस्वारांना मुंबईतील सत्र न्यायालयाने सहा महिन्यांचा तुरुंगवास सुनावला आहे. सहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये ही घटना घडली होती.

पोलिसाला कानशीलात लगावणे दुचाकीस्वारांना महागात पडले; मुंबई कोर्टाने सुनावली 'ही' शिक्षा
पोलिसाला कानशीलात लगावणे दुचाकीस्वारांना महागात पडलेImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 25, 2022 | 9:36 PM
Share

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर भन्नाट वेगाने दुचाकी हाकणाऱ्या तरुणांची काही कमी नाही. विशेष म्हणजे या तरुणांना ज्यावेळी पोलीस रोखतात, त्यावेळी पोलिसांसोबत दादागिरी, हाणामारी करणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. अशा उद्धट दुचाकीस्वारांना (Two Bikers) ताळ्यावर आणण्यासाठी मुंबईतील न्यायालयाने (Mumbai Court) एका प्रकरणात कठोर भूमिका घेत शिक्षा सुनावली. मोहम्मद शकीर अन्सारी आणि असलम मेहंदी हसन शेख अशी दोषींची नावे आहेत. 4 जुलै 2016 रोजी वरळी पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस (Traffic Police) प्रवीण कदम यांच्यावर आरोपींनी हल्ला केला होता.

पोलिसाला कानशीलात लगावणाऱ्या दोघा दुचाकीस्वारांना मुंबईतील सत्र न्यायालयाने सहा महिन्यांचा तुरुंगवास सुनावला आहे. सहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने आता निकाल दिला आहे.

नो एन्ट्री असलेल्या रस्त्यावर दुचाकी चालवताना अडवले होते

मुंबई शहरात वाहतूक नियमावलीच पोलिसांकडून काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. पोलीस विशेष मोहिमा राबवून वाहतुकीचे विविध गुन्हे रोखतात. याच दरम्यान 2016 मध्ये दोन दुचाकीस्वारांना नो एन्ट्री असलेल्या रस्त्यावर दुचाकी चालवण्यापासून रोखले होते.

याचा राग मनातून दोन तरुणांनी संबंधित वाहतूक पोलिसाला मारहाण केली होती. त्या पोलिसाच्या मानेला धरून कानशीलात लगावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयात खटला चालला. त्या खटल्यात न्यायालयाने सहा वर्षानंतर नुकताच निकाल देत दोन्ही आरोपींना सहा महिन्यांचा तुरुंगवास सुनावला आहे.

आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची दिली धमकी

वाहतूक पोलीस कदम यांना शेखने जोरदार थप्पड लगावली. त्यावेळी कदम हे खाली जमिनीवर कोसळले. यादरम्यान शेखने कदम यांची मान आवळण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर अन्सारीने कदम यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याचीही धमकी दिली.

या प्रकरणात सरकारी पक्षाने आरोपींविरोधात भक्कम पुरावे सादर केले. त्या पुराव्यांची गंभीर दखल न्यायालयाने घेतली. याप्रकरणी दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने दोन्ही आरोपींना सहा महिन्यांचा तुरुंगवास सुनावला आहे.

Follow Us
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....