AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसाला कानशीलात लगावणे दुचाकीस्वारांना महागात पडले; मुंबई कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

पोलिसाला कानशीलात लगावणाऱ्या दोघा दुचाकीस्वारांना मुंबईतील सत्र न्यायालयाने सहा महिन्यांचा तुरुंगवास सुनावला आहे. सहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये ही घटना घडली होती.

पोलिसाला कानशीलात लगावणे दुचाकीस्वारांना महागात पडले; मुंबई कोर्टाने सुनावली 'ही' शिक्षा
पोलिसाला कानशीलात लगावणे दुचाकीस्वारांना महागात पडलेImage Credit source: सोशल मीडिया
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Oct 25, 2022 | 9:36 PM
Share

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर भन्नाट वेगाने दुचाकी हाकणाऱ्या तरुणांची काही कमी नाही. विशेष म्हणजे या तरुणांना ज्यावेळी पोलीस रोखतात, त्यावेळी पोलिसांसोबत दादागिरी, हाणामारी करणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. अशा उद्धट दुचाकीस्वारांना (Two Bikers) ताळ्यावर आणण्यासाठी मुंबईतील न्यायालयाने (Mumbai Court) एका प्रकरणात कठोर भूमिका घेत शिक्षा सुनावली. मोहम्मद शकीर अन्सारी आणि असलम मेहंदी हसन शेख अशी दोषींची नावे आहेत. 4 जुलै 2016 रोजी वरळी पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस (Traffic Police) प्रवीण कदम यांच्यावर आरोपींनी हल्ला केला होता.

पोलिसाला कानशीलात लगावणाऱ्या दोघा दुचाकीस्वारांना मुंबईतील सत्र न्यायालयाने सहा महिन्यांचा तुरुंगवास सुनावला आहे. सहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने आता निकाल दिला आहे.

नो एन्ट्री असलेल्या रस्त्यावर दुचाकी चालवताना अडवले होते

मुंबई शहरात वाहतूक नियमावलीच पोलिसांकडून काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. पोलीस विशेष मोहिमा राबवून वाहतुकीचे विविध गुन्हे रोखतात. याच दरम्यान 2016 मध्ये दोन दुचाकीस्वारांना नो एन्ट्री असलेल्या रस्त्यावर दुचाकी चालवण्यापासून रोखले होते.

याचा राग मनातून दोन तरुणांनी संबंधित वाहतूक पोलिसाला मारहाण केली होती. त्या पोलिसाच्या मानेला धरून कानशीलात लगावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयात खटला चालला. त्या खटल्यात न्यायालयाने सहा वर्षानंतर नुकताच निकाल देत दोन्ही आरोपींना सहा महिन्यांचा तुरुंगवास सुनावला आहे.

आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची दिली धमकी

वाहतूक पोलीस कदम यांना शेखने जोरदार थप्पड लगावली. त्यावेळी कदम हे खाली जमिनीवर कोसळले. यादरम्यान शेखने कदम यांची मान आवळण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर अन्सारीने कदम यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याचीही धमकी दिली.

या प्रकरणात सरकारी पक्षाने आरोपींविरोधात भक्कम पुरावे सादर केले. त्या पुराव्यांची गंभीर दखल न्यायालयाने घेतली. याप्रकरणी दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने दोन्ही आरोपींना सहा महिन्यांचा तुरुंगवास सुनावला आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल