AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime: धक्कादायक…. ​मायानगरीत दिवसाला ४ ते ५ मुली बेपत्ता; गुजरात, राजस्थानशी पक्के कनेक्शन, पालकांची वाढली चिंता

Mumbai Crime News: मायानगरीतील पालकांची चिंता वाढली आहे. कारण प्रत्येक दिवशी चार ते पाच मुली शहरातून बेपत्ता होत आहेत. अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याचे समजते. त्यामुळे पालकांच्या जीवाला घोर लागला आहे. काय आहे अपडेट?

Mumbai Crime: धक्कादायक.... ​मायानगरीत दिवसाला ४ ते ५ मुली बेपत्ता; गुजरात, राजस्थानशी पक्के कनेक्शन, पालकांची वाढली चिंता
दिवसागणिक ४ ते ५ मुली मुंबईतून बेपत्ताImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Dec 13, 2025 | 8:30 AM
Share

Girls Missing and Kidnapping Cases: मायानगरीत येण्यासाठी गावातून पलायन करणाऱ्या मुला-मुलींचे प्रमाण कमी नाही. पण आता मायानगरीतूनच दिवसाकाठी ४ ते ५ मुली बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये (Kidnapping) धक्कादायक वाढ झाली आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या १० महिन्यांत (जानेवारी ते ऑक्टोबर) मुलींच्या अपहरणाचे १,१८७ गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजेच दिवसाला सरासरी चार ते पाच मुली बेपत्ता होत आहेत. यामुळे पालकांच्या जीवाला घोर लागला आहे. आयांची काळजी वाढली आहे.

पोलिसांकडे १,१८७ गुन्ह्यांची नोंद

गेल्या दहा महिन्यात मायानगरीत मुलींचे अपहरण, पळून गेल्याच्या आणि मुलगी गायब होण्याचे ११८७ गुन्हे मुंबई पोलिसांकडे दाखल झाले आहे. यामधील १११८ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर इतर जवळपास ७१ प्रकरणांचा तपास पोलीस करत आहेत. आर्थिक राजधानीत यामुळे महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

यंदा ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक गुन्हे

मुलींचे अपहरण आणि बेपत्ता होण्याचे सर्वाधिक गुन्हे ऑक्टोबरमध्ये नोंदवण्यात आले आहे. केवळ ऑक्टोबर महिन्यात अपहरणाचे १३६ गुन्हे नोंद झाले होते, ज्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.जानेवारी ते ऑक्टोबर या काळात महिलांसंबंधित एकूण ५,८८६ गुन्हे नोंद झाले, ज्यात १,०२५ बलात्काराच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या बलात्कारांच्या प्रकरणांपैकी ५२६ गुन्हे अल्पवयीन मुलींशी संबंधित आहेत.

गुजरात, राजस्थानशी पक्के कनेक्शन

मुलींच्या बेपत्ता होण्यामागे अनेक कारणं समोर येत आहे. पोलिसांनी अनेक प्रकरणांचा उलगडा केल्यानंतर या कारणांचं विश्लेषण केले. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. प्रेम प्रकरणातून पळून जाणे, किरकोळ वादातून घर सोडणे, तसेच मुली सेक्स स्केट (Sex Skate) आणि मानवी तस्करीच्या (Human Trafficking) शिकार बनण्याचे प्रमाणही अधिक आहे. तर पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये अल्पवयीन मुलींना राजस्थान, गुजरातसारख्या ठिकाणी लग्नासाठी तस्करी करण्याची प्रकरणे समोर आली आहेत. पोलिसांनी तातडीने दखल घेत १,१८७ पैकी १,११८ गुन्ह्यांची उकल केली असून, समुपदेशनानंतर मुलींना कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाते.

Follow Us
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?