AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rashmi Shukla : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा, 1 एप्रिलपर्यंत कारवाई टळली

आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आज अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना 1 एप्रिलपर्यंत दिलासा दिला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात यापूर्वी पुणे बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

Rashmi Shukla : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा, 1 एप्रिलपर्यंत कारवाई टळली
रश्मी शुक्लाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 11, 2022 | 10:40 PM
Share

मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याविरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये दाखल एफआयआर रद्द करण्यात यावा या मागणीकरीता रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालया (Mumbai High Court)त धाव घेतली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. रश्मी शुक्ला यांना 1 एप्रिलपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांच्यावर कुठलीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शुक्ला यांना तूर्तास अटकेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र आज झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना तपासामध्ये सहकार्य करण्याकरीता निर्देश दिले असून 16 मार्च आणि 23 मार्च रोजी कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये सकाळी 11 वाजता चौकशीला संबंधित अधिकाऱ्यां समोर उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. (Mumbai High Court grants relief to IPS officer Rashmi Shukla in phone tapping case)

पुणे आणि कुलाबा येथील दोन्ही गुन्ह्यांसंदर्भात सुनावणी 1 एप्रिल रोजी

आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आज अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना 1 एप्रिलपर्यंत दिलासा दिला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात यापूर्वी पुणे बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या तक्रारी विरोधात रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यात त्यांना 25 मार्चपर्यंत दिलासा न्यायालयाकडून मिळाला आहे. मात्र आज मुंबई उच्च न्यायालयाने पुणे आणि कुलाबा येथील दोन्ही गुन्हे संदर्भात दाखल याचिकेवरील सुनावणी एकत्र करून 1 एप्रिल रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.

रश्मी शुक्ला यांना चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश

राज्य सरकारतर्फे रश्मी शुक्ला यांना दिलासा देण्याचा विरोध करत सरकारी वकील यांनी आरोप केला की, पुण्यात दाखल गुन्ह्या प्रकरणात न्यायालयाने दिलासा दिला असून त्या प्रकरणात रश्मी शुक्ला तपासात सहकार्य करत नाही. मात्र दुसऱ्या गुन्ह्यात दिलासा देण्यात येऊ नये. त्यावर न्यायालयाने कुलाबा प्रकरणात तपासाची तारीख 16 मार्च आणि 23 मार्च निश्चित केली आहे आणि रश्मी शुक्ला यांना चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. (Mumbai High Court grants relief to IPS officer Rashmi Shukla in phone tapping case)

इतर बातम्या

Thane Crime : बनावट दारूच्या बॉटलचे झाकण बनवणाऱ्या कंपन्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Jammu-Kashmir : काश्मिर खोर्‍यात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरूच; आणखी एका सरपंचाची हत्या

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.