AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ईमेल, संतापाचे धागेदोरे पुण्यातील शाळेपर्यंत, पालकांचा आरोप काय?

मुलाला शाळेत अ‌ॅडमिशन मिळाले नाही म्हणून शैलेश शिंदेंनी गृह विभागाला धमकीचा मेल केला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीची पावलं उचलत घोरपडी भागातून त्यांना ताब्यात घेतलं होतं. 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ईमेल, संतापाचे धागेदोरे पुण्यातील शाळेपर्यंत, पालकांचा आरोप काय?
मंत्रालय बॉम्ब धमकी प्रकरणातील आरोपी शैलेश शिंदेंसोबतचे पालक संतोष पोलकमवार
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 8:15 AM
Share

मुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल पाठवल्या प्रकरणी आरोपी शैलेश शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस पुढील कारवाई करत आहेत. मुलांचे शैक्षणिक वर्ष हॅचिंग शाळेने (Hutchings School) वाया घालवले, आम्हाला न्याय मिळत नाही, असा दावा आरोपी शैलेश शिंदेंसोबतचे पालक संतोष पोलकमवार यांनी केला आहे. (Mumbai Mantralaya bomb scare fake threats via email parents accusations on Pune’s Hutchings School)

मुलाला शाळेत अ‌ॅडमिशन मिळाले नाही म्हणून शिंदेंनी गृह विभागाला धमकीचा मेल केला असल्याचं समोर आलं आहे. संध्याकाळी ईमेल मिळाल्यानंतर तातडीची पावलं उचलत पुण्यातील घोरपडी भागात राहणाऱ्या शैलेश शिंदे यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

पालकांचं म्हणणं काय?

“आम्हाला न्याय नाही मिळाला, म्हणून हा पेपर बाँम्ब आहे. निदान आता तरी सरकार आम्हाला न्याय देईल किंवा देईल की नाही माहिती नाही. आम्ही शिक्षण विभाग, मुख्यमंत्री कार्यालय आणि सर्व प्रशासकीय यंत्रणांना पत्र पाठवली, ईमेल केले, मात्र तरीही आम्हाला न्याय मिळत नाही. मुलांना नापास करण्यात आलं. आमच्या मुलांना शिक्षणापासून हॅचिंग शाळेने वंचित ठेवलं” असा आरोप संतोष पोलकमवार यांनी केला आहे.

“मुख्यमंत्र्यांना 150 मेल”

“शिक्षण विभागाकडे तक्रार केली म्हणून शाळा आम्हाला मुद्दाम त्रास देत आहे. आधी 15 मुलांचा प्रश्न होता मात्र आता 3 मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांना 150 मेल केले, मात्र उत्तर दिलं नाही. मुलांचं शैक्षणिक नुकसान झालं आहे. पाचवीपासून हॅचिंग शाळा त्रास देत आहे. मुलांना जूनमध्ये पास करण्याऐवजी सप्टेंबरमध्ये प्रमोट करते. 2016 पासून हे सुरु आहे” असा आरोपही संतोष पोलकमवार यांनी केला आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.