AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वकिलीचा अभ्यास, मानसशास्त्रात पारंगत, सोशल मीडियावर महिलांना फसवायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सोशल मीडियावरील महिलांना लग्नाचे खोटे आश्वासन त्यांना लुबाडणाऱ्या एका भामट्याला अटक करण्यात आलंय. त्याने आतापर्यंत 11 महिलांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले असून त्याला मुंबईच्या सायबर सेलने अटक केली आहे.

वकिलीचा अभ्यास, मानसशास्त्रात पारंगत, सोशल मीडियावर महिलांना फसवायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
CYBER CRIME
| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 11:15 PM
Share

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील लोक आपला जीवनसाथी शोधतात. यातील अनेक जोडपी ही आजही सुखाने संसार करत आहेत. मात्र याच सोशल मीडियाचा फायदा घेत महिलांना फसवणारे काही भामटे लोकही आहेत. सोशल मीडियावरील महिलांना लग्नाचे खोटे आश्वासन देऊन त्यांना लुबाडणाऱ्या एका भामट्याला अटक करण्यात आलंय. त्याने आतापर्यंत 12 महिलांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले असून त्याला मुंबईच्या सायबर सेलने अटक केली आहे.

तरुण उच्चशिक्षित, महिलांना लग्नाचे आमिष दाखवून लुटायचा

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सतीश गरुड असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार सतीश गारुड हा महिलांना सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवायचा. 30 वर्षांवरील तसेच घटस्फोटीत महिलांना तो आपली शिकार बनवायचा. विशेष म्हणजे गारुड हा उच्चशिक्षण घेत आहे. तो गुन्हेगारी मानसशास्त्र आणि एलएलबी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्राची परीक्षा देणार होता. उच्च शिक्षण घेत असूनदेखील त्याने महिलांना फसवण्यासारखा मार्ग अवलंबल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आतापर्यंत 12 महिलांना फसवलं

आरोपी सतीश गारूड आधी महिलांशी मैत्री करायचा. नंतर जवळीक वाढवून तो या महिलांना लग्नाचे वचन द्यायचा. नंतर फसवलेल्या महिलांकडून तो भरमसाठ रक्कम घेऊन पळून जायचा. त्याने आतापर्यंत अशा 12 महिलांना आपली शिकार बनवले आहे. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला. त्यानंतर विशेष सपाळा रचून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. हा आरोपी 30 वर्षांवरील महिला आणि घटस्फोटित महिलांना फसवत असल्याचे आढळून आले आहे.

चित्रफीती तसेच फोटो शेअर करणे टाळा

दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी महिलांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर कोणाशीही मैत्री करताना काळजी घ्या. शक्यतो ओळखीच्या व्यक्तींनाच समाजमाध्यमांवर आपला मित्र बनवा. तसेच कोणतेही आर्थिक व्यवहार करताना सर्व खबरदारी घ्या. चित्रफीती तसेच फोटो शेअर करणे टाळा, असे आवाहन मुंबई सायबर पोलिसांनी केले आहे.

इतर बातम्या :

Omicron Update | ओमिक्रॉनचा धसका ! या जिल्ह्यात राज्यातील पहिली जमावबंदी; रॅली, धरणे, आंदोलनावर बंदी

राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, लॉकडाऊन लागणार का? काय खबरदारी घ्यावी, टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

Omicron Update | राज्याला दिलासा! डोंबिवली ओमिक्रॉनाबाधिताच्या संपर्कातील सर्व कोरोना निगेटिव्ह, तरीही सावधान!

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक